दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने रविवार (दि.19) रोजी शि .म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात शिवव्याख्याते प्रतिक गायकवाड यांचे व्याख्यान संपन्न झाले.याप्रसंगी बोलताना छ.शिवाजी महाराजाचा कालखंड महाराजांनी घालुन दिलेले आदर्शाचे पालन वर्तमानात आजच्या समाज करत नाही.धर्माच्या नावाखाली वेगवेगळे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी समाजात विध्वंस माजवतात ,जातिपातीचे राजकारण आज भारतात चालत आहे ,खऱ्या अर्थाने भारत देशाला महासत्ताक राष्ट्र बनवायचे असेल तर महाराजांच्या कालखंडात असलेली एकता आजच्या तरुणाईत जागृत होण्याची गरज आहे,तसेच आजची लढाई ही ढाल तलवारींची नसुन प्रत्येक व्यक्तीने आपपल्या क्षेत्रात प्रामानीकपणे देशाच्या प्रगतीसाठी काम करणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाची सुरुवात गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत म्हणुन करण्यात आली.यावेळी जान प्रसारक मंडळांचे सचिव डॅा.अशोकराव मोहेकर,प्राचार्य डॅा.सुनिल पवार ,सर्व प्राध्यापक,प्राध्यापीका,शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन डॅा.डी.ई गुंडरे यांनी केले