दैनिक चालु वार्ता अहमद्पुर प्रतिनिधी-विष्णु मोहन पोले.
अहमद्पुर: तालुक्यातील सुमठाणा येथे 26जानेवारी रोजी ग्रामसभा आयोजित केली होती तेंव्हा नवनिर्वाचित सरपंचांनी गावाकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेतले .माजी सरपंच गणेश पोले यांनी गावातील स्वछता हा प्रश्न प्रकर्षाने मांडला.गावातील नाल्या ,उकिरडे,याच्या पासून होणारी रोगराई आणी त्याचे होणारे नागरिकाच्या आरोग्यावर परिणाम याची खूप सविस्तर मांडणी केली.त्याला विश्वनाथ पोले,विष्णु मुसळे आणी इतर सदस्य आणी गावकरी यांनी दुजोरा दिला.याची गंभीरता लक्षात घेऊन सरपंच आणी ग्रामसेवक यांनी 15 ते 20 दिवसाचा वेळ मागितला आणी दिलेल्या शब्दाला जागून गावातील नाल्यांची स्वच्छता केली ,गावातील नालीच पाणी गावातच तुंबून न राहता ओढ्या तलावा पर्यंत कस पोहचेल अशा पद्धतीने आखनी करून त्यानी काम करून घेतलं.आज काल राजकारणी भुलथापा देऊन पळवाटा शोधतात पण यांनी गावातील जनतेला मागितलेल्या वेळेपूर्वी काम करून दाखवलं त्या मुळे त्यांचं सर्व स्तरातुन् कौतुक होत आहे.सरपंच श्रीमती जिजाबाई पोले आणी त्यांचे पुत्र समाजिक कार्यकर्ते गंगाराम पोले ,ग्रामसेवक राजु कांबळे यांच्या गावकर्यँच्या आरोग्यच्या दृष्टीने गरजेच्या असलेल्या कार्यात घेतलेली भूमिका याच गावकरयच्या वतीने कौतुक होत आहे.त्यांच्या हातून अनेक कामाची अपेक्षा गावाला आहे आणी त्याच बरोबर ते पूर्ण करतील हा विश्वास पण.