दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा)प्रतिनिधी : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा गेल्या ७ वर्षापासून मानधनात छदामही वाढला नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामगार संघटनांच्या माध्यमातून बेमुदत संप करून शासनाविरोधात दंड थोपटले आहे मात्र या संपातून खोदा पहाड निकला चुहा? अशी गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधन वाढीबाबत होवू नये याची दक्षता संपात उतरलेल्या विविध कामगार संघटनांनी घ्यावी असा सूर निघतो आहे दरवर्षी अंगणवाडी कर्मचाऱ्याकडून लढा निधी म्हणून कोटी रुपये कामगार संघटना जमा करतात त्याचा हिशोब मात्र जाहीर रित्या होत नाही शिवाय मानधन वाढ, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, आजारपणातील रजा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी या प्रमुख मागणीला बगल देऊन कामगार संघटना हलक्या दर्जाच्या आणि अर्थहीन मागण्या घेवून कर्मचाऱ्यांचा वेळ आणि पैसा व्यर्थ धाडत राईचा पर्वत करताना दिसून येतात शिवाय अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या कर्मचाऱ्यातून न घेता संघटनाच स्वकल्पतेतून मागण्या लावून धरतात हे कामगार संघटनाचे कच्चे दुवे दृष्टीआड करता येणार नाही. अंगणवाडी सेविका ८,३२५ मिनी अंगणवाडी सेविका ५,५५० आणि मदतनीस ४,५०० यावर आपली गुजराण करतात त्यातही बहुअंशी अंगणवाडी कर्मचारी विधवा, निराधार,घटस्फोटीत या वेदनादायक वर्गाचे नेतृत्व करतात हे कामगार संघटनांना सर्वज्ञात असताना मंत्री,मुख्यमंत्री,आयुक्त,सचिव यांच्यासोबत झालेल्या वार्तालापात खुश होवून मोर्चा,संप,आंदोलन मागे घेण्याचे कर्मचाऱ्यांना आवाहन करताच त्या बिचाऱ्या कर्मचारी संघटनावर विश्वास ठेवून संप,आंदोलने, मोर्चा माघारी घेतात पण यातून कोणाला काय मिळाले? याची चिकित्सा मात्र होत नाही राज्यात सद्यस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरघोस मानधन वाढ या मथळ्याखाली बेमुदत संपाच्या नावावर विविध कामगार संघटनांनी कर्मचाऱ्यांना एकवटले आहे पण पुढे काय होते? याचा थांग पत्ता संपकरी कर्मचाऱ्यांना नसतोच शासनाने अल्प मानधनवाढ करावी आणि त्याला कामगार संघटनांनी व शासनाने भरघोस वाढ म्हणावी असा प्रसंग अंगणवाडी कर्मचाऱ्यावर न येवो ? ही सदिच्छा! शिवाय हलक्या दर्जाच्या मागणीपेक्षा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरघोस मानधन वाढ, शासकीय दर्जा, ग्रॅज्युवटी लागू करणे, शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेणे, आजारपणाच्या रजा, आवश्यक भरपगारी सुट्यासह एस.टी.चालक,वाहक संपासारखा सरकारला वठणीवर आणणारा यशस्वी बेमुदत संप करून मागण्या पदरात पाडून घेणारा संप हवा.अशी संपकरी कर्मचाऱ्यांत कुजबुज आहे बेमुदत संपातून हितकारक मागण्या मान्य करूनच कामगार संघटनांनी आपला अस्सल कामगार बाणा दाखवून अंगणवाडी कर्मचाऱ्यांत विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे त्यासाठी सदर संप कामगार संघटनासाठी एक अग्निपरीक्षा ठरणारा आहे तरच कामगार संघटना कामगार हिताच्या आहेत असे म्हणण्यास वाव राहील नाहीतर वार्षिक शेकडो कोटीच्या घरातला बेहिशोबी लढा निधी हाच कामगार संघटनेचा छुपा उद्देश म्हणण्यास पुरेसा वाव आहे सोबतच कामगार संघटना सरकारच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या बाहुल्या बनू नये एवढीच माफक अपेक्षा !