दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी -दिपक काकरा.
जव्हार: जव्हार तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडी हद्दीतील अनेक गावं-पाड्यामध्ये लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत यांच्या पुढाकाराने लोकोयोगी विकास कामांचा धडाका सुरू असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागल्याने सामान्य जनतेकडून समाधान व्यक्त केले जात आहे.तालुक्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये ९ महसूल गावे आणि ९ पाड्यांचा समावेश असून जवळपास ५६३५ च्या आसपास लोकसंख्या आहे.सरपंच राऊत यांनी थेट जनतेतून निवडून आल्यानंतर ग्रामपंचायतीची सूत्र हाती घेताच मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करत अनेक विकास कामांना गती मिळाल्याचे दिसत आहे.
या विकासात्मक कामांमध्ये जयेश्वर,रामनगर,हाडे(धूमपाडा),कासटवाडी(चोंढीपाडा) या गावात गल्ली पेव्हरब्लॉक रस्त्याचे भूमिपूजन करून लवकरच ह्या कामांना सुरुवात केली जाईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले तर चोंढीपाडा येथे रस्त्यालगत संवक्षण भिंत,हाड्याकडे जाणाऱ्या धूमपाडा-पाटीलपाडा दरम्यानचा डांबरीकरण रस्ता व वडपाडा पासून आकरेकडे जाणार रस्ता डांबरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचेही राऊत यांच्याकडून सांगण्यात आले.या विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुलोचनाताई चौधरी,जव्हार पंचायत समितीचे मा.सदस्य विनायक राऊत,ग्राम पंचायतीचे सचिव ग्रामविकास अधिकारी किशोर सोनवणे,स्थानिक लोकप्रतिनिधी सदस्य,ग्रामरोजगार सेवक,स्थानिक नागरिक उपस्थित होते.