दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
महाराष्ट्र शासनासह संबंधितांचा विश्वासघात करुन केलेली नौकर भरती प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन यातील भ्रष्टाचार्यांंवर कारवाई करण्याची मागणी माजी सभापती अनिल पाटील कर्हाळेंनी केली आहे. २० फेब्रुवारी रोजी राज्याचे पुणे येथिल सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांच्यासह सर्व संबंधितांकडे केलेल्या तक्रारीत २००८ ते २०१४ या कालावधित घडलेल्या कांडाचा मुद्दा उपस्थित केला आहे. आरोप-प्रत्यारोपातून सरकार आणि सहकार प्रशासन कोणती कार्यवाही करणार याकडे तालुकावाशियांचे लक्ष लागणे स्वाभाविक आहे.
किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीची गोकुंदा येथे शेत गट क्र.१७८ ही जमिन २००८ ते २०१४ या कालावधी दरम्यान तत्कालीनच्या सभापतीने लागूनच असलेल्या त्र्येयस्थांना लिज करारावर देऊन हस्तांतरीत सुद्धा केली आहे. जमिनी पाठोपाठ नौकर भरतीतही प्रचंड अपहार केल्याचा आरोप कर्हाळेंनी तक्रारीत केला आहे. शिक्षण संस्थेतील पाच जनांना या कार्यालयात नौकरीवर बहाल केले आहे. जे की, यात सरासर बेकायदेशीर असून पदाचा दुरुपयोग करुन सरकार आणि सहकार विभागाच्या वरिष्ठांना अंधारात ठेऊन विश्वासघातातून हे कृत्य केल्याचा ठपका ठेवला आहे.
किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्यांचे हीत लक्षात घेतले जात नाही. संचालक वजा व्यापारी असलेल्यांचीच जास्त मक्तेदारी चालते. समितीची जी मालमत्ता लिजवर दिली ती पुन्हा विक्री कशी झाली ?, लिज रद्द कशी झाली ?, जनतेच्या पैशावरच्या मालमत्तेची वाताहत केल्या प्रकरणी कारवाईतर झालीच पाहिजे यात कोणाचे दुमत असण्याचे कारणच नसावे.