दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
अद्यावत शासन निर्णय, न्यायालयाचे आदेश/परिपत्रके या सर्व बाबींचे अवलोकन करुन उपोषणार्थींना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी सहायक म्हणून जिल्हाधिकारी नेहा भोसलेंनी किनवट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैष्णवांना दिले आहेत. गटविकास अधिकार्यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन चाचपणी करुन ग्रामसेवकांना निर्देशीत केले. आज (२५ फेब्रुवारी) सहावा दिवस असून अद्यापतरी मार्ग काढण्यास प्रशासनाला यश मिळाल्याचे दिसत नाही. धनदांडग्या विरुद्ध सामान्यांचा लढा असल्याने सहजासहजी मार्ग निघणार नाही. लोकांच्या आरोग्याला बाधा पोहोचल्यास मात्र या धनदांडग्यासह प्रशासनावर त्याची जिम्मेदारी असेल असे उपोषणार्थींचे म्हणने आहे.
के.के.गार्डनच्या मुद्यावरुन पाचव्या दिवस्यीही मार्ग निघालेला नाही. रस्त्यावरील बसवलेले लोखंडी गेट काढून रस्ता खुल्ला करावा ही साधी मागणी सोडऊ शकले नाहीत. परवानगी दरम्यान घालून दिलेल्या अटीशर्थींचे गार्डन व्यवस्थापनाने तंतोतंत पालन केले नसल्यासही कार्यवाही का होत नाही. जो पर्यंत न्याय मागण्या मार्गी लागत नाही तो पर्यंत आंदोलक त्यांच्या मुद्यांवर ठाम असल्याचे दिसते. असे असले तरी, सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसलेंनी प्रकरणाची दखल घेत गटविकास अधिकारी वैष्णव यांना १६ फेब्रुवारी रोजीच चौकशीकामी पत्र पाठवले आहे. त्यावरुन वैष्णव यांनी उपोषण स्थळी भेत देऊन भावना जाणून घेतल्या. ग्रामविकास अधिकार्यांना मार्ग काढण्यासाठी ठणकावले. ग्रामविकास अधिकार्याच्या आणि ग्रामपंचायतीच्या हातात मार्ग काढण्यासाठी कांहीच नसल्याचे सांगण्यात आले. ग्रामपंचायतीने संबंधितांना दिलेल्या नोटीसीची त्यांनी दखल घेतलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर न्याय मिळेलच या विषयीच्या आशा धुसर होऊ लागल्याचे सांगितले. वरिष्ठ पातळीवर काय मार्ग निघेल ? यावर सर्व कांही निर्भर आहे.