दै चालु वार्ता वृत्तसेवा
जळगाव : भुजबळ शुक्रवार पासून खान्देश दौर्यावर आहेत. नाशिक येथून जळगावकडे येत असतांना पारोळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. सतीष पाटील यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आपल्याला अडचणीत आणण्यासाठी विरोधकांनी कट रचला, त्यासाठी पैसा ओतला परंतु शेवटी सत्याचा विजय झाला, या पुढे आता असुर शक्ती विरूद्ध आपली लढाई असणार आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, पणन संचालक संजय पवार, कल्पिता पाटील, माजी सभापती प्रकाश जाधव, जिल्हाचिटणीस डाँ शांताराम पाटील, मनोराज पाटील, दिगंबर पाटील, जि.प सदस्य रोहन पाटील, हिम्मत पाटील, युवक तालुकाध्यक्ष योगेश रोकडे, शहराध्यक्ष कपिल चौधरी, लोकेश पवार, रोहन मोरे, पराग मोरे, अशोक पाटील, संतोष महाजन, अंकुश भागवत, रेखा पाटील, वर्षा पाटील, सुवर्णा पाटील, अनिसा पिंजारी, अन्नपुर्णा पाटील, कल्याणी देवरे, सुनंदा शेंडे,शालाग्राम मालकर, डी. के पाटील, अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी छगन भुजबळ यांनी समाज व राजकारण यांच्यातील टच कसा असतो, याबाबत भाष्य करत आपल्यावर कट रचनेसाठी अनेक पैसा ओतला गेला. मात्र, सत्याचा नेहमी विजय होत असतो असे म्हणाले. यापुढे आपली लढाई असुर शक्ती विरूद्ध असणार आहे. तर, ओबीसी आरक्षण ही हक्कांची लढाई असल्याचेही सांगितले. यावेळी माजी मंत्री डॉ. सतीष पाटील यांच्या कामाचे त्यांनी कौतुक करत, मतदारसंघात डाँ सतीष यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढत असल्याचे म्हणाले.