दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी .
रविवार दिनांक 05 मार्च रोजी नांदेडच्या कुसुम सभागृहात दरवर्षीप्रमाणे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या साहित्य दरबार साठी ग्रामीण कवी,कथाकार बालाजी पेटेकर खतगावकर यांची महाराष्ट्रातील नामवंत कवींच्या कवी संमेलनासाठी निवड झाल्याबद्दल श्री शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा.बाळासाहेब पाटील खतगावकर यांच्या हस्ते
सत्कार करण्यात आला.साहित्य दरबारच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब,कार्यक्रमाचे उद्घघाटक अशोक नायगावकर, प्रमुख उपस्थिती रानकवी तथा चित्रपट गीतकार,ना.धो.महानोर, प्राचार्य,ठाले पाटील हे राहणार आहेत.कवी संमेलन नांदेडच्या कुसुम सभागृहात सायंकाळी पाच वाजता सुरू होणार आहे.
यावेळी साहित्यिक व्यंकट अनेराये सर, मु.अ.सुरेश वनंजे सर, मु.अ.भोसले सर,मु.अ. गोपाळ म्हेत्रे सर.बिरादार सर, सुर्यकांत पाटील, यशवंत पाटील, मारोती वाघमारे, सय्यद रसूल साब,अक्रोमोदीन सर व शाळेच्या सर्व शिक्षक वृंद तर्फे सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.महाराष्ट्रातील दिग्गज कविंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कवितेचा जागर होणार आहे.बालाजी पेटेकर यांच्या यांची कविता सर्वसामान्य ग्रामीण लोकांच्या मनाचा ठाव घेणारी असते त्यांच्या या सार्थ निवडीबद्दल सर्व साहित्य व कवी प्रेमीतून अभिनंदन होत आहे.