दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
चार्वाक अध्यापक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य श्री संजय नारायण पौळ गुरुजी हे शिस्तप्रिय प्राचार्य म्हणून ओळखले जातात .सेवानिवृत्तीनंतर शेतीमध्ये रमलेले हे व्यक्तिमत्व गावामध्ये काहीतरी बदल व्हावा हा उद्देश बाळगून इतरांना सल्ला देण्यापूर्वी स्वतः ते काम करण्याची वृत्ती बाळगतात .देशभरात स्वच्छ भारत अभियान गेल्या आठ वर्षांपासून रबिविण्यात येत असून त्याकरिता राज्य, महानगर ,नगरपालिका स्तरावर स्पर्धा आणि पारितोषिके देण्यात येत आहेत .त्याच ध्यासातून स्वच्छ गाव सुंदर गाव हा उपक्रम स्वतःच्या गावात रबिविण्याची तळमळ बाळगून ते सध्या काम करण्यासाठी पुढाकार घेत आहेत .गावातील सांडपाणी आणि त्याचे नियोजन हा मुद्दा ते ग्रामपंचायत कडे सातत्याने मांडत असतात आणि स्वतः ही शक्य तिथे काम करतात .अश्या ह्या सेवानिवृत्त प्राचार्यांच्या स्वच्छ गाव सुंदर गाव ची संकल्पनेला आता तरुणांची साथ लाभेल या शंका नाही