दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी –
भुम:-. धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेसाठी भाविकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील सर्वच बस आगारांनी जादा बस गाड्या सोडण्यात आल्या होत्या.धार्मिक महोत्सव असो किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असो यासाठी एसटी परिवहन मंडळ नेहमी सज्ज असते. एसटीचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित मानला जातो. आजही बहुतेक लोक लाल परीनेच प्रवासाला प्राधान्य देतात यामधे भूम आगाराकडून ही दिनांक ६ एप्रिल ते ९ एप्रिल रोजी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या . भूम बस आगाराने यात्रेच्या कालावधीमध्ये सर्वाधिक गल्ला जमवत जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. भूम आगारातील वाहक मुकेश भगत यांनी सर्वाधिक ८५००० हजार रुपये कॅश मिळवली आहे. भगत यांना ‘कॅश मिशन’ म्हणून ओळखले जाते . या उत्कृष्ट कार्याबद्दल वाहक मुकेश भगत यांचा आगार प्रमुख अलकुंटे व वाहतूक निरीक्षक गायकवाड यांनी सत्कार करून कौतुकांनी पाठ थोपटली .यावेळी आगारातील कर्मचारी उपस्थित होते.व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.