दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :- अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन अंतर्गत पाच किलो मीटरवर अंतरावर
अकोट-अंजनगाव सुर्जी रोडवर लखाड हे गाव असून सोमवारी दि.१० च्या सायंकाळी ७:३० वाजता लहान मुलांसोबत इंस्टाग्राम पोस्ट वायरल झाल्याच्या कारणावरून
अल्पसंख्यांक व गावातील चौखंडे नामक युवकाशी वाद झाला.असुन या किरकोळ वादाला वेगळे वळण लागल्याने गावातील दोन्ही गटातील नागरिक आमने-सामने आले.वाद दोन समुदयात असल्याने याची माहिती तत्काळ अंजनगांव सुर्जी पोलीस स्टेशनचे सहाय्यक ठाणेदार आश्विन राठोड यांना देण्यात आली.त्यांनी क्षणाचाही विलंब न करता,आपले सर्व पोलीस कर्मचारी घेऊन लखाड येथे घटनास्थळी दाखल झाले.दोन्ही गटांना समजून सांगत परिस्थित आटोक्यात आणली.या वादातील जखमी युवकाला
तात्काळ अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता आणले.
दोन्ही गटाचे नागरिक आमने-सामने आल्यावर प्रकरण मारहाणीपर्यंत पोचले.या
प्रकरणातुन एका गटाच्या व्यक्तींने अंजनगाव सुर्जी येथे फोन वरुन भांडण झाल्याची माहिती दिली व काही युवक लखाड येथे पोहचले.गावामध्ये झालेल्या हाणामारीत फैजलखान वल्द शाहदत खान वय २० रा.लखाड हा जखमी झाला त्याला पुढील उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात रेफेर करण्यात आले.अंजनगाव सुर्जी पोलीस लखाड येथे तत्काळ पोचल्यामुळे प्रकरण शांत झाले.या मधील दोन्ही गटाचे लोकांना कडुन कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये रात्री दोन वाजेपर्यंत दाखल झाली नव्हती.
घटनेचे गंभीरता बघता
ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड हे रात्री घटनास्थळी दाखल झाले आणि दंगा नियंत्रक पथक सुद्धा दाखल झाल्याने गावात शांतता निर्माण झाली.संपूर्ण घटनेवर,सचिद्र शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी रात्री उशिरापर्यंत लक्ष ठेवून होते.पथ्रोट येथील ठाणेदार लंबे,रहिमापूर-चिंचोली येथील ठाणेदार देशमुख आपल्या ताब्यासह लखाड येथे दाखल झाले होते.आरोपींचा शोध घेत भांडणातील युवकांना रात्रीच शोध मोहीम राबवून साह्ययक पोलीस निरीक्षक राठोड यांनी बारा व्यक्तींना अटक केली आहे.लखाड येथे पोलीसांनी रात्रभर गस्त घातली आहे.अंजनगाव सुर्जी सह महत्वाच्या ठिकाणी पोलीसांनी दगडा बंदोबस्त लावल्याची रात्री दिसून आले.
सदर घटनेमुळे अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता पंरतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत तणाव निवळला सदर शुल्लक घटनेने गावात वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवण्यात आल्याने उपविभागीय अधिकारी सचिन्द्र शिंदे यांनी नागरिकांना अफवांना वर विश्वास ठेवु नये असे नागरिकांना सांगितले आहे.
रात्री उशिरा नंतर फिर्याद नोंदवून गुन्हे दाखल करण्यात आले.यामध्ये अपराध क्रमांक २६३ फिर्यादी सुभाष भिमराव चौंखडे रा.लखाड ता.अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती यांच्या सांगण्यावरून भादवी कलमानुसार ३२६,३२४,३२३,१४३,१४७,१४८,१४९ व १३५ गून्हे दाखल करण्यात आलेआहे.यामध्ये फैजल खान ,शेख नावेद, शेख इमाम ,मुजर शेख सोफियान, शेख गुड्डू उर्फ नावेद ,शेख इजाज ,शेख अश्फाक, शेख सिदीक ,शेख भुर्या, दानिश खान,व इतर पाच ते सात व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तर अपराध क्रमांक.२६२ फिर्यादी शेख नदीम शेख शोजोहोदीन रा. लाखाड ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती यांच्या सांगण्यावरून भादवी कलमानुसार ३२६,३२४,३२३,१४३,१४७,१४८,१४९ व १३५ ओम चौखंडे, मंगेश राऊत, नितीन बनचरे,सागर चौगंडे. यांच्या वर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
आता परिस्थिती नियंत्रणात असुन गावात शांतता आहे. अंजनगाव येथील ठाणेदार दीपक वानखडे यांनी आज तात्काळ शांतता कमेटीची बैठक बोलावली असुन अंजनगाव तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले व त्यांनी सांगितले की,कोणत्याही अफावंर विश्वास ठेवु नये.