दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी- माणिक सुर्यवंशी
चला जाणूया नदीला” या कार्यक्रमांतर्गत मन्याड नदी अमृत वाहिनी करण्याची जबाबदारी संस्कृति संवर्धन मंडळ (सगरोळी) संस्थेने स्वीकारली. नाम फाऊंडेशन, जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने लोकसहभागातून मन्याड नदीतील गाळ काढण्याचे कार्य सुरू झाले आहे. वझरगा, तुपशेळगाव, गळेगाव, लिंबा या ठिकाणचे शेतकरी उत्स्फूर्तपणे शेतीसाठी गाळ घेऊन जात आहेत. ह्या उपक्रमास जेष्ठ इतिहासकार तथा नदी अभ्यासक श्री.डॉ. गो. ब. देगलूरकर यांनी भेट देऊन मन्याड नदीचे ऐतिहासिक महत्त्व व अध्यात्मातील वारसा याविषयी माहिती विषद केली. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. प्रमोद देशमुख, डॉ. सारंग महाराज देगलूरकर यांनीही येथील शेतकऱ्यांशी चर्चा केली.