दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी- माणिक सुर्यवंशी.
: बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील गजानन देवकरे या तरुण शेतकऱ्याने नापिकिस व बँकेच्या कर्जास कंटाळून आत्महत्या केली आहे.
बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील तरुण शेतकरी गजानन दिगांबर देवकरे (३५) यांच्या नावे आदमपूर येथे एक एकर कोरडवाहू शेत जमीन आहे. त्या शेतावर सगरोळी येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज होते. बँके कडून असलेले कर्ज माफी करून दुसरे ५० हजाराचे महात्मा फुले प्रोत्साहन कर्ज परतफेड मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते.परंतु अर्ज दाखल करून बरेच दिवस झाले होते तरी ते ५० हजार रुपये महात्मा फुले शेतकरी प्रोत्साहन कर्ज मिळाले नाही. व तसेच शेतात पिकलेल्या हरभरा पिकाला योग्य भाव मिळाले नसल्याने आर्थिक विवेचनातून ता.१८ रोजी सकाळी ७ वाजता स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला सदरील कर्जबाजारी शेतकरी फाशी घेऊन आत्महत्या करीत स्वतः जीवन यात्रा संपवली आहे. त्यांच्या पाश्चात्य आई, पत्नी, १ मुलगी, २ मुले, ३ बहिणी असा मोठा परिवार आहे.