दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
श्री संप्रदायाचे प्रमुख पद्म श्री भुषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र शासनाने आयोजीत केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार गौरव सोहळा कार्यक्रमात खारघर येथे झालेल्या दुर्घटनेत उष्माघाताने आणि झालेल्या चेंगराचेंगरीत आता पर्यंत १३ दास भक्त मृत्यु पावले असल्याचे समजते.या दुर्घटनेत मयत १३ दास भक्तांपैकी म्हसळा तालुक्यातील एक महीला व एका पुरुषाचा अशा दोन दास भक्तांचा मयतांमध्ये समावेश आहे.म्हसळा तालुक्यातील वारल येथील रहिवाशी जयश्री जगन्नाथ पाटील वय वर्षे ५२ आणि मेंदडी येथील महेश नारायण गायकर वय वर्षे ४२ यांचा उष्मा घाताने दुर्दैवी मृत्यू झाला.या दुःखद घटनेची माहिती मिळताच श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार आदिती तटकरे यांनी मायतांचे घरी येवुन त्यांचे नातलगांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.कुटुंबीयांना धीर देताना हे दुःख सहन करण्याची ईश्वर ताकद देवो अशी आमदार आदिती तटकरे यांनी प्रार्थना केली.या वेळी त्यांचे समावेत महीला तालुका अध्यक्षा सोनल घोले, मिना टिंगरे,लहू म्हात्रे,महेश घोले आणि स्थानीक मान्यवर मंडळी उपस्थित होते.