दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे
मंठा शहरासह तालुक्यातील अनेक भागाला गुरुवारी (ता.२७) रात्री उशिरा वादळी वारे, व काही भागात गारपीट बेमोसमी पाऊस व तडाखा बसला. यात रब्बीच्या पिकांसह आंब्याचे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे यंदा गावरान आंबे कमी प्रमाणात खायला मिळणार असल्याचे चित्र आहे.
मंठा शहरासह तालुक्यातील तळणी, उस्वद, केहाळ वडगाव, नायगाव, जयपूर,वझर सरकटे, बेलोरा,मंगरूळ, गेवराई, केदार वाकडी, केंधळी, उंबरखेडा, उसवड देवठाणा, बरबडा, हातवण, उंबरखेड, पांगरी, गडदे पांगरा, हिवरखेड यादी भागात वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने हजेरी लावली.
उस्वद येथे वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने बीज उत्पादन कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे चित्र आहे
काही ‘भागात हा पाऊस अधिक प्रमाणात होता तर काही भागात वाऱ्याचा जोर अधिक व गारपीट असल्याने अनेकांच्या घरावरील तसेच जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.