दै चालु वार्ता वृत्तसेवा :
कलकत्ता : ‘दिल्लीतील माझ्या सात ते आठ वर्षांच्या कारकिर्दीत मला कळलं आहे की, पंतप्रधान मोदींचा एकतर बंगाली लोकांवर विश्वास नाही किंवा ते कुठेतरी त्यांच्याशी सुसंवाद साधण्यात, सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यात अपयशी ठरले आहेत‘, असं बाबुल सुप्रियो म्हणाले. ‘मी दीदींच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी बंगालच्या लोकांची सेवा करण्यासाठी आलो आहे‘, असंही बाबुल सुप्रियो म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये काहीच दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कारण, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी खासदार बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.दरम्यान, आता भाजपाला रामराम ठोकल्यानंतर बाबुल सुप्रियो यांनी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘पंतप्रधान मोदींचा बंगाली लोकांवर विश्वास नाही. ते बंगालमधील लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध जोडण्यास अपयशी ठरले आहेत‘, अशी टीका बाबुल सुप्रियो यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर केली आहे.
बाबुल सुप्रियो यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ आहे.