दैनिक चालु वार्ता उपसंपादक आष्टी-अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): बेलोरा(बु) येथील शेतकऱ्याच्या वहिवाट रस्त्यासाठी लागणाऱ्या गौण खनिजसाठी आकारली जाणारी रक्कम कमी करण्याची मागणी बेलोरा (बु)येथील सरपंच मिलिंद जाणे यांनी आष्टी तहसीलदार सचिन कुमावत यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे याबाबत असे की,बेलोरा गावातील शेतकऱ्यासह नागरिकांची ८० टक्क्यापेक्षा जास्त वहिवाट कॅनॉलच्या रस्त्याने आहे संबंधित पाटबंधारे विभागास एका निवेदनाद्वारे विनंती केली मात्र पाटबंधारे विभागात एवढा पैसा नसल्याने पाटबंधारे विभाग हतबल झाला आहे त्यामुळे महसूल विभागाच्या मालकीचा असलेला गौण खनिज (मुरूम) उचलण्याच्या स्वामित्व धनाच्या आकारण्यात सूट मिळावी असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे शिवाय आर्वी विधानसभेचे आमदार दादाराव केचे यांनी विधानसभेत ४८१४७ क्रमांकावर तारांकित प्रश्न सुद्धा उपस्थित केला आहे हे विशेष पण पावसाळा ऋतु तोंडावर असताना अद्याप शासकीय स्तरावर रस्ता वहिवाटीसाठी कोणतीच कारवाई होत नाही त्यामुळे सरपंच मिलिंद जाणे यांनी जिल्हाधिकाऱ्यासह आ. दादाराव केचे यांना निवेदन देऊन रस्त्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत यासाठी लोकप्रतिनिधीसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे