दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : सत्ता संघर्षाच्या लढाईत आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युतीचे सरकार वाचले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल दिलासाजनक असल्याचे सांगून या निकालाने आम्ही पूर्ण समाधानी असल्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांनीही सांगितले. त्यामुळे आनंद गगनात मावेनासे झालेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे परभणी शहरात व जिल्ह्यात सर्वत्र सर्वत्र पेढे वाटून फटाके फोडण्याचा जल्लोष साजरा केला गेला आहे.
शिवसेनेचे परभणी जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांनी आपल्या हजारो सहकारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह गांधीपार्क या शहराच्या मध्यवर्ती भागात जुलूस काढला होता. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जनतेला पेढे वाटून एकमेकांनाही भरवले. त्यानंतर चौकाचौकात फटाके फोडून सर्वत्र जल्लोष साजरा केला.
असाच जल्लोष पूर्णा, पालम, गंगाखेड, पाथरी, जिंतूर, सेलू, मानवत परिसरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात केला गेल्याची चर्चा आहे.
मागील दहा महिन्यांपासून सत्तेवर बसलेले शिवसेना-भाजपा युतीचे सरकार असंवैधानिक आहे, गद्दारी करुन सत्तेवर बसलेलं हे सरकार औटघटकेचे असून कधीही कोसळले जाईल अशी मविआमधून सतत टीका केली जात असे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर टीकास्त्र सोडत माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही टीकेची झोड उठवली होती. अर्थात तसे रान उठवले जाणे व त्यांना राग येणे स्वाभाविकच होते. कारण याच ४० आमदारांनी गद्दारी करुन भाजपशी हातमिळवणी केली होती.परिणामी त्यांना सत्तेवरुन पाय उतार व्हावे लागले होते.
दरम्यान, राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावाच लागेल अशी विधाने मोठमोठी कायदे तज्ज्ञ मंडळी सुद्धा निकाल लागला जाणार, त्या दिवशी सकाळपर्यंत बोलतांना आढळून आले. १६ आमदारांना अपात्र ठरवले जाईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे सांगितले जात होते. एवढेच नाही तर जर १६ आमदार अपात्र ठरले गेलेच तर आणखी २२ आमदारांवर सुध्दा तशीच कारवाई होऊ शकते, ज्यामुळे हे सरकारचं अस्तित्वात राहाणारे नाही असा विश्वास व्यक्त करुन शिंदे यांच्या संपूर्ण सरकारवरच अपात्रतेची टांगती तलवार असल्याचे बोलले जात होते. माध्यमांनी तर एकेक मंत्र्यांना गाठून रात्री झोप लागली का नाही, कोणत्या तरी देवाला सरकार वाचू दे म्हणून गाऱ्हाणे घातले का नाही, असे नानाविध प्रश्न विचारुन भंडावून सोडले गेले होते.
दरम्यान, आज सकाळपासूनच शिंदे यांचं सरकार जाणार हे गृहीत धरुनच मविआचे नेते व बहुतांश माध्यम प्रतिनिधी वावरत होते. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने प्रारंभी शिंदे यांनी घेतलेले कांहीं निर्णय चुकीचे ठरवत तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेवरही प्रखर टीका करीत ताशेरे ओढल्याचे वाचनात स्पष्ट केले. व्हीप आणि प्रतोद व १६ आमदारांच्या अपात्रते विषयी विधानसभेचे अध्यक्ष निर्णय घेतील असे महत्वपूर्ण निर्देश दिले. खंडपीठाने तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर मात्र त्यांना ते पद पुनश्च मिळवून देण्यासाठी प्रयत्नही करता आले असते असे सूचित संकेत देत ती संधी आता त्यांनी गमावल्याचे सांगत सध्या कार्यरत असलेले शिंदे सरकार जैसे थे,असेच राहून काम चालवू शकेल असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे शिंदे सरकार वाचले हेच सिद्ध झाले. सभागृहाचे सार्वभौमत्व अबाधित राखत नियमाप्रमाणे जे जे करणे उचित राहिल असे निर्णय अध्यक्ष राहूल नार्वेकर लवकरात लवकर घेतीलच यात जरा सुद्धा संदेह नाही. एकूणच काय तर सरकार पडणार पडणार, ज्यांनी देव पाण्यात बुडवले होते, प्रतिक्षा करीत बसलेले ते सर्वच जण पूरते या निर्णयामुळे हताश झाले होते. किमान २०२४ पर्यंत तरी तरी त्यांना सत्तेपासून दूरच राहावे लागणार असल्याने त्यांचा राग अनावर येणे स्वाभाविक आहे.
दरम्यान, आजी व माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात आरोप प्रतिआरोपांच्या बऱ्याच फैरी झाडल्या गेल्या आणि ते स्वाभाविक होते. उर्वरित विषय आणि प्रलंबित बाबींचा निपटारा कायद्यानुसार लवकरच लागला जाईल असेच दिसून येत आहे.
राज्यात सत्ता संघर्षाचा
हा एवढा मोठा डाव उलथवून सत्तेची संपूर्ण बागडोर एकनाथ शिंदे यांच्याच हाती पुन्हा सोपवून युतीचे हे सरकार अगदी निर्धोकपणे कार्यरत ठेवणे ही काही साधी मजल नव्हती परंतु ती सुध्दा शक्य झाली आहे. हे काही थोडे थोडके नव्हते. उध्दव ठाकरे यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता पदाचा राजीनामा दिला. मुळात ते करायलाच नको होते. परिणामी सत्तेवरून पाय उतार व्हावे लागले. झालेली चूक पुन्हा. भरुन येते अशक्यप्राय असेच होते. त्यानंतर जे जे काही नाट्य घडली गेली, आणि राज्याच्या सत्तेची बागडोर एकनाथ शिंदे यांच्या हाती सोपवून अमीत शहा यांनी स्वतः फोन करुन देवेंद्र फडणवीस यांना पद सोपविले. त्याच वेळी आम्ही निक्षून सांगितले होते की, हेच सरकार टिकले जाईल, यात तिळमात्र शंका नसावी. परंतु आमच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते. आमच्या सर्व मित्रमंडळींना आम्ही अभ्यासपूर्ण सांगण्याचा प्रयत्न करीत होतो, परंतु काही केल्या ते मानायला तयार नव्हते. काल जेव्हा निकाल लागला आणि शिंदे सरकार वाचले असून तेच कार्यरत राहिले जाईल, असे जेव्हा खंडपीठाने जाहीर केले तेव्हा मात्र आमच्या बोलण्याला काही तरी धार आहे, जणू हेच सिद्ध झाले. नंतर मात्र आम्ही त्या मित्रांना पुन्हा फोन करुन साठवणीतल्या त्या आठवणी जागा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र फोन घेण्याचे बऱ्याच जणांनी टाळले.