दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:महाराष्ट्रात सध्या तेलंगणातील भारत राष्ट्र समितीच्या वतीने जोर लावण्यात येत आहे. परंतु या ठिकाणी राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न आहे असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. देगलूर येथे विश्रामगृहामध्ये देगलूर बिलोली विधानसभेचे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर व संजय राऊत यांच्यामध्ये चर्चा झाली मैदानी प्रादेशिक पक्षाच्या भूमिका वर आपले मत व्यक्त केले. तेलंगणातील भारत राष्ट्र समितीने आपल्या पक्षाचा अध्यक्ष विस्तार करण्याच्या उद्देशाने पहिले पाऊल महाराष्ट्रातील नांदेड येथे टाकले आहे. चंद्रशेखरराव यांनी हा प्रयोग केला आहे तसेच शुक्रवारी त्यांनी राज्यभरातील 288 विधानसभा मतदारसंघातील प्रमुखांचे शिबिर ही नांदेड येथे घेतले. त्यावर संजय राऊत यांनी टीका केली.