दैनिक चालु वार्ता लातूर जिल्हा प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
(अहमदपुर येथील महात्मा फुले विद्यालयातील व इतर शाळेवचा हा प्रकार.)
==========================
लातुर/अहमदपुर: अहमदपुर शहर शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाते पण येथील काही खाजगी शाळा,संस्थानी याला व्यापाराच केंद्र बनवलं आहे.अहमदपुर शहरातील महात्मा फुले विद्यालयात व इतर शाळेमध्ये उन्हाळी क्लास च्या नावावर नववी उत्तीर्ण आणी दहावी वर्गात जाणाऱ्य विध्यर्थ्यांना प्रत्यक्ती ३,००० हजार रुपये फी घेतली जात आहे .हा नेमका काय प्रकार आहे ? सुट्या मध्ये तुम्ही शिकवता त्याचे पैसे घेताय तर मग शाळेच्या वर्गाचा का वापर करता?तुम्ही खाजगी खोली घेऊन शिकवा नाहीतर मग शाळेत क्लास घेत असाल तर तुम्हाला विध्यर्थ्यांना पैसे मागण्याचा अधिकार आहे का?अशी पालकांची भावना आहे.
महात्मा फुले ,यशवंत, टागोर ,संत ज्ञानेश्वर या शाळेत आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षण घेणारी मूल ही बहुतांश शेतकरी,मजदूर यांची मुले आहेत कारण त्यांच्या परस्थिती मुळे अहमदपूर सारख्या शिटी मध्ये शिक्षण घेत आहेत. ३,००० रु फिस शेतकऱ्यांच्या मुलांनी कसे शिक्षण घ्यायचे त्यांना फी एवढी देऊन परवडणार आहे का परवडणार आहे का?शाळा व्यवस्थापन याच्यावर कारवाई करेल का?काही पत्रकारांनी संबंधित शिक्षक याना चौकशी केली असता त्यांनी सांगितले की बाहेर क्लास साठी फरपूर फिस आहे आणि महात्मा फुले मध्ये ३,००० रु आहे तर यशवंत मध्ये बघा जाऊन ३,५०० रु आहे असे सांगितले. व काही पालकांचा कॉल आला असता त्यांनी संगीतले की आमच्या मुलीची १,००० रु फी राहिली होती तर आमच्या मुलीला सांगितले की तू फीस घेऊन ये फिस नाही घेऊन आली तर तुमचा रिझल्ट आमच्या हातात आहे असे शिक्षक यांनी त्या मुलीस सांगितले, की तुझी टी. सी यशवंत ला टाक तिथे फिस किती आहे बग असे त्या मुलीस सांगितले हे सर्व मनमानी कारभार चालू आहे प्रशासन यांच्यावर का दुर्लक्ष करत आहे . सदर शाळेची चौकशी का नाही करत यांच्यावर योग्य ते कार्यवाही का नाही करत ? मा. B,O ढोकाडे साहेब व E. O मा.मापारी साहेब , केंद्र प्रमुख कोणाळे सर यांना कळविण्यात आले आहे .प्रशासन दखल घेणार का ?असा या अहमदपूर तालुक्यातील पालकांचा प्रश्न पडला आहे ? अहमदपूर मधील शिक्षणाचा व्यापार ,बाजार रोखला नाहीतर सामान्य लोकांना शिक्षणा पासून वंचित राहावं लागेल.