दैनिक चालु वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
भू म:-माणूस विचाराने जोडला जातो,मुठभर माणसाच्याच विचाराने क्रांति होते,चांगल्या विचाराचे व्यसन अंगी जडले पाहिजे असे मत व्याख्याते देवा चव्हाण यांनी व्यसन मुक्ती केंद्राच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने व्यसनमुक्त झालेल्यांचा सत्कार व नुकत्याच पोलीस भरती प्रक्रियेत यशस्वी झालेल्या युवकांचा सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
गुरुवार दि २ जुन २०२३ रोजी कै. विलासराव रोकडे फाउंडेशन संचलित स्वस्थ मानस व्यसनमुक्त केंद्र व पोलीस स्टेशन भूमच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने व्यसनमुक्त झालेल्यांचा सत्कार व नुकत्याच पोलीस भरती प्रक्रियेत यशस्वी झालेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला. या निमित्ताने व्याख्याते देवा चव्हाण व चंद्रकांत उळेकर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. व्याख्यान प्रसंगी व्याख्यात्यांनी प्रबोधन करताना राज्याला जवळपास ३००० कोटि महसूल मिळतो, व्यसनमुक्तीवर फक्त ३०० कोटि खर्च होतो, जगण्यापेक्षा मरणावर जास्त खर्च करतोय, व्यसनाधिन जीवंत असून मरण यातनेत जगतो, कुटुंबाला मरणाच्या वाटेकडे पाठवतो अशी खंत व्याख्यात्यांनी व्यक्त केली .या वेळी तहसीलदार अभिजित जगताप,पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, ह भ प अरुण शाळू महाराज , योग शिक्षक संजीवन सातपूते, केंद्र प्रमुख राजेश किशन, ब्रह्मकुमारी राजश्री बहन, माजी नगराध्यक्षा श्रीमती जिजाबाई रोकडे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी व्यसनमुक्त केंद्राचे मुख्य प्रवर्तक नवनाथ विलास रोकडे, विठ्ठल बागडे, शंकर खामकर , योगेश आसलकर आदिनी परिश्रम घेतले सुत्रसंचलन आलिम शेखसर, शंकर खामकर यांनी केले.