दै चालु वार्ता वृत्तसेवा /
नाशिक : महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था अर्थात ङ्कमित्राङ्कच्या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली होती.
मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणवार झालेल्या पावसानं हाहाकार उडवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेलं संपूर्ण पीक जमीनदोस्त झालं आहे.या शेतकऱ्यांना धीर सोडू नका असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सरकार त्यांच्या पाठिशी ठामपणे उभं असल्याचा विश्वास देखील शेतकऱ्यांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची परिस्थिती बोलून दाखवली.
यावेळी बोलताना छगन भुजबळांनी उद्धव ठाकरेंचा केलेला ङ्कबिचारे मुख्यमंत्रीङ्क उल्लेख ऐकून अनेकांच्या भुवया काही क्षण उंचावल्या. मात्र, भुजबळ नेमके कोणत्या संदर्भात हे म्हणाले, हे स्पष्ट होताच उपस्थितांनी देखील त्याला सहमती दर्शवली. ‘ग्लोबल वॉर्मिंग वगैरे मुळे जिथे पाऊस पडायला हवा तिथे पडत नाही. जिथे पडतो तिथे खूप पडतोय. कधी दुष्काळ पडतोय. कधी पाऊस सगळंच वाहून नेतो. इथूनही फटका पडतोय, तिथूनही फटका पडतोय. बिचारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर काम करत आहेत. या सगळ्याचं ग्लोबल वॉर्मिंग हे प्रमुख कारण आहे‘, असं भुजबळ म्हणाले.