दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
देगलूर: गेले एक दीड वर्ष झाले संपूर्ण महाराष्ट्रातील नगर परिषदेतील नगराध्यक्ष व नगरसेवकांची मुदत संपल्यामुळे नगरपरिषदेचे जनहि तार्थ कार्यप्रणाली मुख्याधिकारी आपल्या सहकारी कर्मचारी बांधवांच्या मदतीने बघत आहे. या काळात नागरिकांची मुलभूत कामे कोणतेही वाद विवाद न होता शांततेने होत आहेत.
नगर परिषदेतील नगरसेवक है पद दीड वर्ष झाले अस्तित्वात नाही. म्हणून सर्वसामान्य जनतेला काहीच फरक पडलेला दिसत नाही. असे चित्र आजघडीला दिसुन येत आहे. असे जर होत आहे तर मग नगरसेवकांची आणि नगराध्यक्षांची गरजच नाही असे नागरिकांना वाटत आहे. नगरसेवक ही पोस्ट जर रद्द केली तर अनेक फायदे सरकारचे आणि त्याचबरोबर जनतेचे सुध्दा होतील.
निवडणुकीत होणारा करोडो रुपयांचा खर्च, वेळ, श्रम शासनाचा ओघाने जनतेचाही वाचेल. गल्ली गल्लीत घरा घरात होणारे अवै चारीक मतभेद, स्वार्थी वाद संपुष्टात येतील, तसेच निवडणुकीत जाती पाती वरून होणारे वितुष्ट होणार नाहीत, एकोपा वाढेल. नगरपालिकेत नागरीक आणि प्रशासन यांच्यामध्ये नगरसेवक यांची कुरघोडीची मध्य स्ती नसलेने जनतेची कामे होण्यास त्रास होत नाही.जनतेसाठी होणाऱ्या मुलभूत होणाऱ्या कामात देण्या घेण्यावरून वाद होणार नाहीत, त्यामुळे करोडो रुपयांचा होणारा भ्रष्टाचाराचा 1 वाटा कमी होईल. जनहितार्थ कामातील टक्केवारी, नगरसेवक व नगराध्यक्षां ची गुत्तेदार बनुन काम करण्यात वाढत असलेला प्रकार. अत्यंत खेद जनक आहे. नगरसेवक लाखो रुपये निवडणुकीत खर्च करतात याच काळात तरुण पिढीला व्यसन लाग ण्याचे प्रमाण वाढत असते, तसेच निवडणूक काळात रोज पाय असल्याने आयत खाऊन लाचारी येते ही वेळ तरुणांच्यावर येणार नाही.
या निवडणुकीत अडकणाऱ्या पिढीला स्वतःच्या रोजगारासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी लक्ष घालून स्वाभिमानाने जगता येईल. तसेच आपल्या कुटुंबाला चांगला वेळ देता येईल. संपूर्ण महाराष्ट्रातील नगरसेवक यांना देण्यात येणारे करोडो रुपयांचे मानधनपण सुध्दा शासनाचे ओघाने जनतेचे वाच तील. तसेच फ्लेक्स साठी होणारा खर्च त्यातून होणारे प्रदूषण आणि शहराचे विद्रुपीकरण सुध्दा वाचेल.
जर नगरसेवक ही पोस्ट नसेल आणि नगरपालिका प्रशासन व्यव स्थित कामकाज करीत असेल तर नगरपालिका निवडणूक कायमच्या रद्द कराव्यात ही मागणी सर्व सामान्य जनतेतून होतनगरसेवक, नगराध्यक्ष होण्याची दिवसा “शेख चिल्लीची” स्वप्न बघ णारी काही अफलातून मंडळी बॅनर पोष्टर बाजी तर कधी वाढदिवसाचे पोष्टर लावुन ” मी एक कार्यकर्ता चांगला कार्यकर्ता “दाखविण्याचा बेअकल्ली प्रयोग करताना दिसुन येत आहेत. जनता हुशार आहे. कोण ? कसा? आहे, या विषयी जाणून आणि समजुन आहे. वाढदिवसाचा ‘केक’ थोबाडावर लावून मिरवायचं, मेनबत्ती विजवुन टाळ्या वाजवणं म्हणजे वाढदिवस. हा प्रकार जगा तील सर्व श्रेष्ठ भारतीय संस्कृतीला अशोभनीय प्रकार होय. किती वर्ष जगलोत? कश्याप्रकारे जगलोत, कश्यासाठी जगलोत? पुढं किती वर्ष जगणार? वाढदिवसाच्या दिवशी किती दिवस जगण्याचे कमी झाले? या बाबी चिंतन- मनण करून पुढील उरलेले आयुष्यातील दिवस सुखाने राष्ट्र, धर्म, आई – वडीलांचे नावलौकिक करण्याचा एक संकल्प करुन ईश्वरी आराधना करण्याचा दिवस होय. मात्र आजची अपवादात्मक युवा पिढीतील काही मंडळी नगरसेवक, सरपंच पदांचे पोकळ स्वप्न बघत स्टेटस, बॅनर वर प्रचाराचे नवं तंत्र वापरत आहेत. मात्र जनता सर्व बाबी समजून आहे. या गोष्टींची अज्ञानी मंडळींना काय कळणार? काळ बदलतोय, नितीमत्ता, सदाचार, नसलेल्या भ्रष्टाचारानि घरी बसण्याचे दिवस आलेले आहेत.