दै चालु वार्ता वृत्तसेवा /
पणजी: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी खासदार राहुल शेवाळेही उपस्थित होते. आमच्याकडे निर्लज्ज येत नाही. निर्लज्जांना शक्यतो आम्ही घेत नाही. एका पक्षातून निवडून यायचं आणि दुसऱ्या पक्षात जायचं हे सध्या गोव्यात सुरू आहे. त्यामुळे मी हे म्हणत आहे. गोव्याला एक परंपरा आहे. गोव्यात अनेक चांगले राजकारणी झाले. पण अलिकडे गोव्याचं राजकारण निर्लज्जतेच्या पातळीवर गेलं आहे, असं राऊत म्हणाले.
गोव्यातील दलबदलूंना शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार फटकारले आहे. गोव्यात आम्ही स्वबळावर लढणार आहोत. युती आणि आघाडीचं राजकारण करणार नाही, असं सांगतानाच आमच्याकडे निर्लज्ज येत नाहीत.आम्ही निर्लज्जांना शक्यतो शिवसेनेत घेत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तसेच
आज एका तिकिटावर निवडून यायचं आणि लगेच निर्लज्जपणे दुसऱ्या पक्षात सत्तेसाठी उडी मारायची. हे कुठे तरी गोव्याच्या जनतेलाच थांबवावं लागेल. हे कशा पद्धतीने थांबवायचं याची योजना शिवसेनेकडे आहे. गोव्यात वारंवार पक्षांतर करणं किती काळ चालणार?, असा सवाल त्यांनी केला. तसेच पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले
गोव्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीचे वारे वाहू लागले म्हणून आम्ही आलो नाही. नेहमी येतो. कमिटमेंट म्हणून आलोय. आम्ही आघाडी आणि युती टाळण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना म्हणून २२ ते २५ जागा लढणार आहोत. मजबूत सरकार हवं असेल तर गोव्याची जनता शिवसेनेला मतदान करेल. शिवसेनेचे आमदार गोव्याच्या विधानसभेत निवडून पाठवतील. गोव्यात चांगलं सुशासन द्यावं ही आमची भूमिका आहे, असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.