एच. एन.इकडे यांना दहिफळ आरोग्य केंद्र सोडून जावं वाटेना दुसरीकडे…
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा.दवणे जालना (मंठा )
तालुक्यातील दहिफळ खंदारे येथील आरोग्य केंद्रामध्ये दहा-बारा वर्षांपासून एच. एन.इकडे हे रुजू झालेले आहेत त्यांना दहिफळ आरोग्य केंद्र सोडून का जाऊ वाटेने नेमकं दुसरीकडे इथेच का त्यांचं मन रमलय याची काहीतरी भनक ग्रामस्त विजेंद्र मस्के यांना लागल्यामुळे त्यांनी तालुका आरोग्य आधीकाऱ्याकडे त्या दहा -बारा वर्षपासून एकाच ठिकाणी गोचीडा सारखा चिकटून बसलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याची बदली करण्याची मागणी लेखी निवेदन देऊन केली आहे.
सविस्तर माहिती अशी की
दहीफळ खंदारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे एकच कर्मचारी एच. एन. ईकडे हे दहा ते बारा वर्षे झाली एकाच ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र दहिफळ खंदारे येथे कार्यरत असून वरिष्ठना मी बघून घेतो व त्यांच्या संगनमताने हातमिळवणी करून आरोग्य केंद्र चा गाडा चालवत आहेत. नवीन एखांदा कर्मचारी दहिफळ खंदारे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू होत असेल तर त्याला गावातील लोकांची भीती दाखवून येथील लोक खूप खराब आहेत येथे रुजू होण्या अगोदरच भीती दाखवून हुसकावून लावत आहे किंवा आरोग्य केंद्र दहिफळ खंदारे येथील वातावरण खराब आहे असे भीती दाखवून नवीन कर्मचाऱ्यांना रुजू होऊ देत नाहीत, आणि स्थानिक राजकीय मंडळींना हातमिळवणी करून बाकी कर्मऱ्यांना बिघडवून देत आहे यांना मी आहे काही टेन्शन घेऊ नका स्थानिक कॉटरवर कोणाला राहायची गरज नाही आणि बरेच जण आठवड्यातून गैर हजर राहून एकदा येऊन सर्व हजेरी पटावर सह्या करून जातात आरोग्य केंद्रात कर्मचारी कधीच हजर दिसत नाही आणि कधीही औषधीच उपलब्ध नाही म्हणून सांगतात असा प्रकारे ते कर्मचारी संगमताने आठवड्यातून एकदाच सह्या करून सामान्य जनतेची व शासनाची दिशाभूल करत आहेत यामुळे सामान्य जनतेला नाहक त्रास होऊन तालुकाच्या ठिकाणी इलाजासाठी खाजगी दवाखान्यात खर्चाचा भुर्दंड बसत आहे, व तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र दहिफळ खंदारे येथे वर्ष २०२०ते २०२३ पर्यंत सरकारी विविध योजने अंतर्गत झालेल्या कामे व खर्च याची सखोल चौकशी करून व एच. एन ईकडे यांची बदली करून ही १० ते १२ वर्षांपासून मजबूत झालेली ही संगमताची बनलेली साखळी तोडावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर
विजेद्र सर्जेराव मस्के यांची स्वाक्षरी होती