कळका ता.कंधार येथील शेतकऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन सादर
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :- खरीप हंगामातील महत्त्वाचे पिक समजल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकावर शेवटच्या टप्प्यात पिवळे मोजॅक या विषाणुजन्य रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणामध्ये कंधार तालुक्यातील कळका गावातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांवर झालेला आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता असल्याकारणाने शेतकऱ्यांमध्ये अत्यंत चिंतेचे वातावरण पसरले आहे. आम्ही याबाबत मागील १५ दिवसापासून पीक विमा कंपनीकडे पाठपुरावा करुन सदरील नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी विनंती केली होती. याबाबत शासनाने दोन-तीन दिवसापूर्वी सदरील सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे समजले आहे. तरी आपण संबंधित यंत्रणेला त्वरीत याबाबत सर्व शेतकऱ्यांचे वस्तूनिष्ठ पंचनामे करण्याच्या योग्य त्या सूचना द्याव्यात व हे सर्व पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करुन शासनाकडे अहवाल पाठवावा, जेणे करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत होईल.अशी तहसीलदार कंधार यांना निवेदन देऊन नुकसानीचे त्वरीत पंचनामे करण्याची समस्त गावकरी मंडळी कळका.ता.कंधार जि.नांदेड.यांनी केली आहे.