ASP च्या नेतृत्वात विद्याभारती अभ्यासिकेचे विद्यार्थी धडकले जिल्हा कचेरीवर…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती : गत दहा दिवसांपासून आजाद समाज पक्षाने सरकारच्या बहुजन विरोधी धोरणाविरोधात अमरावती जिल्हाकचेरीवर बस्तान मांडले आहेत.दिवसेंदिवस खाजगीकरण व कंत्राटीकरण चा विरोध संपुर्ण राज्यात वाढत आहे.अनैतिक संबंधातून बनलेले सरकारचे मंत्री मात्र खोके घेतल्याने त्यांचे एकदम ओके झाले.पण कंत्राटी नोकरभरती चा जी आर काढुन युवा वर्गाचे डोके मात्र खुपचं भडकलेले दिसते.पाच-सहा वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांनी काय करायचे.राज्यातील विविध जिल्ह्यांत रोष असुनही सरकार विद्यार्थ्यांची वेदना समजायला तयार नाही.गरीबांची मुले अभ्यास करून शासकीय नोकरी मिळवण्यासाठी धरपडत असतात.पालक आपल्या पाल्यांना शिकविण्यासाठी पोटाला चिमटा देतात. सरकार मात्र लोककल्याणकारी धोरण न आखता कार्पोरेट क्षेत्राला मदत होईल असे धोरण आखते.याबाबत युवा वर्गात प्रचंड चिड निर्माण झाली आहे.
आंदोलनाच्या १० व्या दिवशी विद्याभारती अभ्यासिकेचे विद्यार्थी आजाद समाज पार्टी च्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हाकचेरीवर धडकले. तेव्हा त्यांचा सरकारप्रती रोष पहायला मिळाला.कंत्राटी नोकरभरती व शाळेच्या खाजगीकरणाचा जीआर रद्द झाला पाहिजे.सरळसेवा भरती करा,सर्व नोकरभरती जाहीरातीसाठी एका वर्षाला एकदाच परिक्षा फी आकारावी,वाढलेले परिक्षा शुल्क कमी करावे,६५ हजार शिक्षकांची भरती करावी,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटीपद्धती ची २७ सप्टेंबर ची जाहीरात रद्द करा,अशा अनेक मागण्या घेऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मनिष साठे,किरण गुडधे,डॉ.महेश बलान्से,सनी चव्हाण,ज्योती बोरकर,वंदना बोरकर,संजय गडलिंग,समीर हुडके,अनिल फुलझेले,वासुदेव पात्रे,जंजिर सिंग,लक्ष्मण चाफळकर,रवी बागडे,गोपाल ढेकेकर,स्वाती भटकर,माही सिरसाठ,रुपाली भगत,सुरभी घरडे,रुपाली आठवले,शशांक म्हसने,श्रीकांत तळणकर,अमोल नरेकर,किशोर जाधव,शमानंद निमगडे,रोहीत भटकर,अंकुश टोंम्पे,अजय लयभोर आदी अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.