दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : गेल्या १ ऑक्टोबर पासून जिल्हाभरात शिवसेनेच्या होऊ द्या चर्चा अभियानाला सुरवात झाली आहे.अश्यातच दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील अंजनगाव सुर्जी येथे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे,युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचा “होऊ द्या चर्चा” हा कार्यक्रम अंजनगाव सुर्जी शहरातील लाला चौक सुर्जी येथे शांततेत पार पडला.या अभियानादरम्यान सरकारच्या फसव्या योजनांचा पर्दाफाश करण्यात आला.सर्वसामान्य शेतकरी,कामगार,व्यापारी व सर्वसामान्य वर्गात या सरकारबद्दल प्रचंड नाराजी असून जनता नाखूष आहे.याला वाचा फोडण्यासाठी कार्यक्रमा दरम्यान केंद्र सरकार व राज्य सरकारवर शिवसेना पक्ष नेते बरसले.प्रचंड महागाई,बेरोजगारी व सत्ताधाऱ्यांच्या खोट्या आश्वासनाला जनता हैराण झाल्याचा आरोपही शिवसैनिकांनी कार्यक्रमा दरम्यान केला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख सुनील खराटे,वैभव पेवेकर संपर्क प्रमुख दर्यापुर विधानसभा,रवींद्र राजुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर तारेकर,माजी उपजिल्हाप्रमुख देविदास वाळके पाटील,विनोद खारोडे,रवींद्र नाथे,तालुकाप्रमुख कपिल देशमुख,शहर प्रमुख राजेंद्र अकोटकर,अभिजीत भावे,अक्षय गवळी,गजानन चौधरी,सचिन गावंडे,गजानन विजयकर,रामेश्वर आवंडकार,शरद फीसके,अनुप रेखाते,अंकुश गुजर,अंकुश दातीर,गजानन पाठे,विनोद पाटील,विनोद पायघन,आदिल खतीब,अफसर सौदागर,फिरोज खान,सुनील घोडे,सागर दातीर,अंकुश होटे,शुभम कहार,किशोर हाडोळे,मयूर राय,सुनील अळसपुरकर,सुरज पवार,प्रमोद ताळे,सागर कुरील,दिलीप कोठेकर,पुरुषोत्तम आवंडकर,शुभम भोंडे,गौरव कतोरे,राहुल चौधरी,गजानन कराळे,सुरज अरबाड,तेजस खोडसकर,मंगेश नाठे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्यावेळी आमच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता होती त्यावेळी त्यांनी राज्यातील अन्नदात्याला कर्जमुक्ती दिली.हे सरकार तर सर्वसामान्यांना घोषणांवर-घोषणा देत आशावादी चित्र प्रदर्शन करून पिळवणूक करण्याचे काम करीत आहे.
– रवींद्र राजुस्कर