दै.चालू वार्ता
प्रतिनिधी वाशिम दिनकर गडदे
वाशिम / जयपूर येथील व परिसरात नावलौकिक असलेले शेतकरी माधव बल्लाळ सर 32 वर्ष नोकरी करून शेतीकडे वळले एवढेच नव्हे तर आजही ते पारंपारिक पद्धतीने शेती करतात. शेतीमध्ये खरिपाची पिके फळबाग पालेभाज्याचा पण समावेश आहे. अनसिंग ते ढील्ली रोडवर असणारी माधव बल्लाळ सर यांची शेती आवर्जून परिसरातील शेतकरी बांधव पाहण्यासाठी जातात.
व शेतीतील व्यवस्थापन सूक्ष्म स्वरूपाने निरीक्षण करतात एवढेच नव्हे तर दरवर्षी बल्लाळ सरआपल्या शेतीमध्ये खरिपाची पिके सोयाबीन, कापूस, मूग, उडीद तुर सह रब्बीची पिके गहू, हरभरा, ज्वारी अशी पिके योग्य प्रकारे करून घेतात. व त्यामध्ये उत्पादन ही भरपूर काढतात. त्यामुळे अनेक शेतकरी जिल्ह्याभरातून त्यांच्याकडे शेतीचे व्यवस्थापन व मार्गदर्शन घेण्यासाठी येतात.
त्यामुळे परिसरातील सर्वच व्यक्तींना त्यांच्या शेतीतील उत्कृष्ट नियोजन उत्कृष्ट उत्पादन व पारंपारिक शेती करण्याची पद्धत चांगलीच अवगत असल्याने परिसरातील शेतकरी त्यांना शेती व्यवस्थापनातील मॅनेजमेंट गुरु असे पण म्हणतात. सध्या त्यांच्या शेतामध्ये चालू घडीला..