महिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्या – रुपाली चाकणकर…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी मंगळवार दि.१० ऑक्टोबर २०२३ रोजी नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे सकाळी ११ वाजता होणार असून आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेणार आहेत.अमरावती जिल्ह्यात होणाऱ्या या जनसुनावणीस अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्यात,असे आवाहन आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर दि.१० ऑक्टोबर रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा,यासाठी आयोगाकडून महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे.जनसुनावणीनंतर महिला व बालकांच्या विषयांच्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्याची आढावा बैठक होईल.यावेळी जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक तसेच कामगार आयुक्त,आरोग्य,परिवहन,शिक्षण आदी विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती असणार आहेत.
‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या की,महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत करित आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही.त्यामुळे आयोग जिल्हा स्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहे.महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलीस प्रशासन,विधी सल्लागार,समुपदेशक,जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते.यातून आपल्या समस्या मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग करत आहे.