आत्महत्येचे कारण सात महिन्यापासून मानधन मिळाले नसल्याने व बॅकेच्या कर्जबाजारीपणामुळे….
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :- नांदेड जिल्हातील कंधार तालुक्यातील चौकी धर्मापुरी येथील ग्राम रोजगार सेवक संतोष बालाजी कळकेकर वय ३५ वर्षे असून यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.संतोष कळकेकर आत्महत्या करण्याचे कारण असे आहे की ग्रामपंचायत कार्यालय चौकी धर्मापुरी यांनी सहा सात महिन्यापासून केलेल्या कामाचे मानधन दिले नाही. तसेच कसल्याही प्रकारचा मोबदला दिला नसल्यामुळे व शेतातील पिके पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पिके हातचे गेल्यामुळे बॅकेच्या कर्ज बाजारीपणामुळे ग्राम रोजगार सेवकांनी आपले जीवन गळफास घेऊन संपविले आहे.अशी वेळ कोणावर येऊ नये ढकारण ते त्यांच्या घरच्यांचे आधार होते. त्यांच्या पच्छात पत्नी, मुलगा, मुलगी, चार बहीणी व पुतण्या असा त्यांचा परिवार आहे.कै.संतोष कळकेकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली.