वैजापूरात भरउन्हात जाहीर सभा मराठा आरक्षण मिळवनारच….
दैनिक चालु वार्ता
वैजापूर प्रतिनिधी भारत पा.सोनवणे
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर)- मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताशी घेवून अंतरवली सराटी गावातून महाराष्ट्रभर रान पेटवले आहे. मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाची धग गावागावात,घराघरात पोहोचली आहे. 40 दिवसात आरक्षण देण्याचे सरकारने जाहीर केल्यानंतर गावोगावी साखळी उपोषणे सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या कानाकोपयात जावून सकल मराठा बांधवांसोबत संवाद साधत आहेत. 14ऑक्टोंबर रोजी मराठा समाजाची संवाद सभा अंतरवली सराटी येथे शंभर एकर जागेमध्ये होणार आहे. या सभेची पूर्वतयारी म्हणून राज्याच्या कानाकोपयात सकल मराठा समाजाला निमंत्रित करण्यासाठी मनोज जरांगे पाटील विविध ठिकाणी सभा घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी त्यांची वैजापूर शहरात पंचायत समिती समोर जाहीर सभा झाली वैजापूर येथे मनोज जरांगे पाटील यांची मराठा संवादसभा सकाळी आकरा वाजता पार पडणार होती मात्र नाशिक जिल्ह्यातील येवला येथील सभाआटोपून तीन तास ते उशिरा सभास्थळी पोहचले ,यादरम्यान शिवशाहीर गणेश पा.गलांडेयांनी पोवाडा व गित सादर करुन उपस्थितांचे मनोरेजन केले त्यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा समाजाने जरांगे पाटील यांचे दमदार स्वागत केले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सत्तेचा गैरवापर केला असून कार्यकत्यांना पुढे करुन त्यांनी सामाजिक वातावरण बिघडवलंय. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना समज देण्याची गरज आहे. असे सांगून मराठ्यांना आरक्षण मिळावल्याशिवाय आता हा लढा थांबणार नाही. आरक्षणाच्या आड याल तर याद राखा. असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
सरकारमध्ये लय नमुने, काहीही डाव टाकतील पण आता आमच्यात फूट पडणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. सरकार लय डाव टाकतंय, रात्रीतून काहीही करतील नेम नाही, पण आम्ही सावध आहोत असं मनोज जरांगे पाटलांनी सागितले सकल मराठा समाजाच्यावतीने 9 ऑक्टोबर रोजी वैजापूर शहरातील आयोजित सभेत ते बोलत होते. मराठा आरक्षणासाठी देण्यात आलेली 40 दिवसांची मुदत आता संपत आली आहे. त्यामुळे प्रतीक्षता आहे ती सरकारच्या निर्णयाची. उन असो की पाऊस, हा लढा आता थांबणार नाही. समाजाच्या लेकरांसाठी ही आरपारची लढाई आहे. परंतु असे असले तरी कुठेही गालबोट न लागता आंदोलन यापुढेही सुरूच राहील. आम्ही सरकारला वेळ दिला नव्हता, सरकारनेच वेळ मागून घेतला होता. ती वेळही आता संपत आली आहे. समाजाच्या एकाही मुलाने आत्महत्येचा मार्ग पत्करायचा नाही. तुम्ही आत्महत्या करणार असाल तर मग आरक्षण मागायचे कुणासाठी ? असा प्रश्न उपस्थित करून आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदनशील भूमिका घ्यावी. गेल्या अनेक वर्षापासून हा लढा सुरू आहे. त्यामुळे आता संधी सोडणार नाही. असे सांगून भुजबळ साहेब यांच्याबद्दल गेल्या चार दिवसांत मी शब्द काढलेला नाही. परंतु वैजापूर येथे आल्यानंतर कळाले की पोलिसांनी आयोजकांना नोटीस दिल्यां. भुजबळ साहेब आता कार्यकत्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते जरी म्हणत असले की, मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतु असे असले तरी ‘आमचं अन् तुमचं घर एकच आहे, पण एकटेच 35 टक्के खाताय’ असा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला.त्यावेळी हजारोंच्यासंखेने मराठा समाजबाधवांची उपस्थिती होती…