अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
जालना येथे राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय परीक्षा केंद्रावर काही संशयित कॉफी डिव्हाईसच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका बाहेर पाठवून तिचे उत्तर सोडून घेण्यात आलेले कोतवाल भरतीच्या लेखी परीक्षेत हायटेक कॉफी करत पेपर फुटीचे प्रकरण ७ ऑक्टोबर ला उघडीस आले.तसेच परीक्षा सुरू होण्यापूर्वी अनेक मुलांच्या मोबाईलवरही पेपर प्रश्न आलेले होते.त्यामुळे भरतीत दुहेरी गोंधळ झाल्यामुळे सदरील परीक्षा पुन्हा घेण्यात यावी.अशी मागणी प्रहार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष शुभम शिंदे अंबड यांनी अंबडं तहसील कार्यालय मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला. यावेळी प्रहार संघटनेचे काही कार्यकर्ते उपस्थित होते सोमनाथ वाघुंडे,कैलास गुडे,रवी गायकवाड,भाऊसाहेब मुळे,सचिन जाधव,रवींद्र जाधव आदींच्या सह्या अंबड तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले…