मराठ्यांना आरक्षण द्या अन्यथा परिणामांना तयार राहा :मनोज जरागे पाटलांचा सरकारला रोखठोक इशारा, अंतरवाली सराटीत जाहीर सभेसाठी जमलेल्या लाखोच्या जनसागर ,जरांगे ची शिंदे .फडवणीस .पवार. भुजबळावर टीका…
अंबड प्रतिनिधी
ज्ञानेश्वर साळुंके
जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी गावात विराट सभा पार पडली. राज्यभरातील लाखोंचा मराठा समुदाय या विराट सभेसाठी आला. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या सभेतून मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणावरुन पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला. नेमकं काय म्हणाले जरागे पाटील? जाणून घ्या सविस्तर….
१० दिवसांत आरक्षण द्या अन्यथा…
“आजचा दिवस हा मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस आहे. आज घराघरातला मराठा आयुष्यभर छातीवर हात ठेवून या ऐतिहासिक सभेचा साक्षीदार होतो, हे सांगेल असे म्हणत सरकारला उरलेल्या १० दिवसात मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा, अशी मागणी केली. तसेच १० दिवसांपेक्षा जास्त वेळ वाट पाहणार नाही…” असा खणखणीत इशाराही सरकारला दिला.
सात मोठ्या मागण्या….
हा मोठ्या मागणे
1.महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन प्रत्येक मराठ्याचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा
२. कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशी देण्यात यावी
३. मराठा समाजासाठी बलिदान दिलेल्या ४५ बांधवांना सांगितलेला निधी, आणि कुटुंबाला सरकारी नोकरी द्यावी
४. दर दहा वर्षाला ओबीसी आरक्षण दिलेल्या बांधवांचा सर्व्हे करण्यात यावा. तो सर्व्हे करण्यात आलेला नाही. असा सर्व्हे करुन प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात
५. सरकारने मराठा समाजाला १० दिवसांत आरक्षण द्यावे
६. सारथीमार्फत पीएडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे सर्व प्रयत्न तातडीने मार्गी लावण्यात यावेत.
७. महाराष्ट्रातील मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्या. NT, VJNT प्रवर्गासारखे टिकणारे आरक्षण द्या.
भुजबळ यांच्यावर निशाणा…
यावरुन अंतरवालीच्या सभेतून जरांगे पाटलांनी भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला. “ज्या गोरगरीब मराठ्यांनी तुला मोठं केलं, त्यांचेच रक्त पिऊन तुझ्यावर धाड पडली. गोरगरीब जनतेचे पैसे खाल्ले आणि दोन वर्ष आतून बेसन खाऊन आला आणि हा आम्हाला शिकवतो पैसे कुठून आले… अशी टीका त्यांनी यावेळी केली.
सदावर्तेंना फटकारले…
छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते यांचे नाव घेत मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले. सदावर्ते कुणाचे पिल्लू आहेत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या मालकांनी आता हे सांगितलं आहे का? १०६ आमदार तुम्हाला यासाठी निवडून दिले होते का?” असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केला.
पुढील रणनिती…
आम्ही 24 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहणार आहे. 22 ऑक्टोबर रोजी आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. आता आम्ही माघार घेणार नाही. त्यानंतर मी टोकाचं उपोषण करेल. आता एक तर आरक्षण मिळाल्याची विजय यात्रा निघेल किंवा माझीच अंत्ययात्रा निघेल, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
सरकारवर गंभीर आरोप…
आपल्या भाषणामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सरकावर काही गंभीर आरोपही केले. माझं फेसबुक अकाऊंट बंद केले आहे. पण फेसबुक अकाऊंट काय आहे? लोक एवढे जमलेत. त्या पुढं फेसबुक अन् इंटरनेट काय आहे? आता आम्हा मराठ्यांना रोखू शकत नाही.. असे जरांगे पाटील म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप…
छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्तेंचे नाव घेत जरांगे पाटलांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले. “उपमुख्यमंत्र्यांनी असले येडपाट पाळलेत कशाला? मोदी साहेब फडणवीसांना समज द्या, कार्यकर्ते (सदावर्ते) अंगावर घालू नका असे म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ आणि सदावर्तेंना मराठ्यांना उकसवण्यास सांगितले आहे.” असा गंभीर आरोप यावेळी केला.
भुजबळांना समज द्या…
आपल्या भाषणातून जरांगे पाटील यांनी “मी अजितदादांना विनंती करतो. छगन भुजबळांना जरा समज द्या. नाहीतर ते माझ्या नादी लागले तर काही खरं नाही. मग मी सोडत नाही,” अशी मागणी केली.
पुन्हा तीव्र आंदोलन…
तसेच “केंद्र आणि राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. तुम्ही आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 40 व्या दिवशी काय करणार हे सांगू शकत नाही. आम्ही तीव्र आंदोलन करू, असा सूचक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.