मराठा आरक्षणासाठी ऐन सणसुदीत जालना येथील तरुणाने मुंबईत बुधवारी आत्महत्या केली .या आत्महत्या मुळे एकच खळबळ उडाली आहे आत्महत्यापूर्वी लिहिलेले चिठ्ठीत एकच मिशन मराठा आरक्षण, एक मराठा लाख मराठा, असे तरुणानं लिहिलं आहे…
ज्ञानेश्वर साळुंके अंबड प्रतिनिधी
मराठा आरक्षणाची मागणी राज्यभरातून होत असताना मराठा बातमी समोर आली आहे जालना येथील तरुणाने मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली( सुनील बाबुराव कावळे रा. चिकणगाव ता अंबड जि जालना )असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे तरुणाचा मृत्यू सायन रुग्णालयात असल्याची माहिती समोर येत आहे
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील बाबुराव कावळे या 45 वर्षे तरुणांनी मुंबईत वाद्रे परिसरात एक उड्डाणपुलाच्या भीतीला गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनील कावळे कामानिमित्त जालन्याहून मुंबईला गेला होता. पण गेल्या काही दिवसापासून तो छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडी भागात तील राजनगर परिसरात पत्नी व मुलांसह राहायला आल्याचे समजते ते व्यवसायाने चालक होता . त्याच्या आत्महत्या मुळे त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे .आत्महत्यापूर्वी सुनील कावळे यांनी टी-शर्ट आणि वहीच्या पानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे .मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून पत्रही लिहिल्याचे समजते
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे कालपासून (बुधवारी )मुंबई दौऱ्यावर आहेत. आज ते नवी मुंबईसह अनेक शहराचा दौरा करणार आहेत यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी 150 एकच जागेवर लाखोची सभा घेतली .एकीकडं मराठा आरक्षणासाठी लाखोंचे शांततेत मोर्चा पार पडले. तर दुसरीकड मराठा युवकांना मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करावा लागत आहे…
Related Stories
2 days ago