इंडियन पँथर सेनेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र…
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/बिलोली :- महाराष्ट्र सरकारने मागील महीन्यात कंत्राटदारांकडून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती, सरकारी शाळा दत्तक योजना आणि समूह शाळा चे शासनादेश निर्गमित केले आहेत. हे शासनादेश सार्वजनिक शिक्षण व्यवस्था आणि सरकारी नोकर ही संकल्पना मोडीत काढून गोरगरीबांना शिक्षणाची दारे बंद करणारे व सुशिक्षित बेरोजगारांच्या आशा आकांक्षा उद्ध्वस्त करणारे, कर्मचाऱ्याना सेवा सुरक्षा नाकारणारे आहेत. त्यामूळे कंत्राटीकरणाचा रद्द केलेला शासन निर्णय व राज्यातील ६२ हजार जिल्हा परिषद शाळा दत्तक देण्याचा निर्णय माघार घेऊन शासन निर्णय त्वरीत अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा अशी मागणी इंडियन पँथर सेना प्रमुख संविधान दुगाने यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यातील बेरोजगार विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि युवक बेचैन आणि अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे हे शासन आदेश रद्द करण्यात यावे अशी मागणी करत अनेक बेरोजगार युवक व सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने करताच शासन कंत्राटीकरणाचा शासन निर्णय माघार घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे मात्र अधिकृत असा शासन निर्णय पारित न केल्याने केवळ आश्वासनच तर शासनाकडुन दिलं जात नाही ना अशी शंका बळावत आहे.
त्यामूळे त्वरीत शासन निर्णय पारित न केल्यास २५ जानेवारी २०२४ पासून इंडियन पँथर सेना राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.