दै.चालु वार्ता
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
अंबड मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाला दिलेल्या मुदत संपल्याने. उपोषणकर्त मनोज जरांगे पाटील यांनी पुढील भूमिका जाहीर केली. असून आता 25 तारखेपासून मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करणे असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या उपोषणाचा आपण अन्न. पाणी व वैद्यकीय उपचार काहीच घेणार नसून 28 तारखेपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण करण्यात येईल. या काळात प्रत्येक गावात राजकीय नेते पुढाऱ्यांना बंदी घातल्या जाणार आहेत. तसेच हा संपूर्ण आंदोलन शांततेत केल्या जाणार असून .कोणीही तरुणांना आत्महत्या सारखे टीकाचे निर्णय घेऊ नये .असे आवाहन .मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे
जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटी( जि जालन येथे पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली ती म्हणले मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात एकही राजकीय नेत्याला येऊ दिला जाणार नाही आरक्षण घेऊनच गावात यायचं नाहीतर आमच्या गावाच्या हद्दीपर्यंत ही येऊ देणार नाही प्रत्येक सर्कलमध्ये तसेच महाराष्ट्रातील गावागावात साखळी उपोषण सुरू केल्या जाणार आहे 28 तारखेपासून साखळी उपोषणाचे स्वरूपात आम्हाला उपोषणात होईल प्रत्येक गावात प्रचंड संख्येने मराठा समाजाला एकत्र येऊन सरकारला जाग करण्यासाठी कॅडल मार्च काढण्याचे आहेत असे मनोज जरांगे यांनी सांगितले
सरकारने हे आंदोलन गांभीर्याने घ्यावे..
सरकारने ह्या गोष्टी गांभीर्याने घ्यावी हे होणारा आमरण उपोषण आणि होणारे साखळी उपोषण महाराष्ट्रातील पाच कोटी मराठा चालविणार आहेत. मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय मिटवा 25 तारखेला 28 च्या उपोषणाबाबत दिशा सांगितल्या जाणार आहे ती तुम्हाला पेलणार नाही .तुम्हाला ऐकताना हे सहज दिसत असेल .पण हे शांतते सुद्धा होणार आहे. कोणीही आत्महत्येस उग्र आंदोलन करायची नाही .कोणाही आत्महत्या करायची नाही असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे.