दै.चालू वार्ता
प्रतिनिधी,उमापूर कृष्णा जाधव
गेवराई, उमापूर मधील जनता फक्त प्रस्थापितांच्या भूलथापेला बळी.
तीस वर्षापासून गावाला रस्ते नाहीत.
तीस वर्षापासून गावाला पाणी नाही.
तीस वर्षापासून गाव घाणीच्या साम्राज्यात आहे.
तीस वर्षापासून गावाला घाण पाण्याच्या नाल्या नाहीत.
तीस वर्षापासून गावाला कचराकुंड्या नाही.
तीस वर्षापासून गावात एकही सार्वजनिक शौचालय व मुतारी नाही.
तीस वर्षापासून घाणीचे गच्च भरलेल्या नाल्या तशाच आहे.
दहा वर्षापासून उमापूर गावाला फाट्यावर बस स्टॅन्ड नाही.
तीस वर्षापासून गावात अतिक्रमणे थैमान वाजवले आहे.
आज ही गावात शौचालय बाबतीत अस्वच्छता आहे.
तीस वर्षात गावातील वस्त्यांना एकही रस्ता नाही.
उमापूर हे गाव आज ही विकासापासून वंचितच आहे.
विकास काय आहे या उमापूर गावकऱ्यांना आजही माहीत नाहीअसे गावकऱ्यांना वाटते.
गावातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पाण्याचा मग पाण्यासंबंधीचे बजेट जाते हे कुठे…!
हा प्रश्न उमापूरकरांना पडलाय…?
प्रस्थापितांनी आज 30 ते 35 वर्षापासून गाव अंधारातच ठेवले आहे असे म्हणायला हरकत नाही.
उमापूर हे एका मोठ्या सर्कलचे गाव असून या गावाचा विकास दबला गेला असून,येथे वस्त्यांना एकही रस्ता नाही, नाल्या नाही,शौचालय नाही, सार्वजनिक मुतारी नाही, कचराकुंड्या नाही,आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावाला चक्क बस स्टॅन्ड ही नाही…….
किती मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे या गावाला पिण्यासाठी पाणीही नाही.
या उमापूर गावाच्या आत वीस ते पंचवीस खेड्यांची लोक येतात जातात पण या गावाचा बस स्टॅन्ड अचानक अतिक्रमणात गायब झाले असून,येथे अतिक्रमणाने आपले साम्राज्य निर्माण केले आहे. प्रवाशांना आता गावाच्या बाहेर एक किलोमीटर एसटी बससाठी पायी चालत जावे लागते.
उमापूर फाट्यावरही प्रवाशांसाठी काहीही सुविधा नाही.सार्वजनिक मुतारी शौचालय ही नाही. कजराकुंडीही नाही.व येथे प्रवाशांना थांबण्यासाठी जागाही उपलब्ध नाही.
प्रस्थापितांनी या गावालाकधीही तीस वर्षात विकास दाखवलाच नाही.
आजही या गावाला तीस वर्षापासून पिण्याची पाणी नाही.
ग्रामपंचायत मध्ये व आवारात ग्रामपंचायतग्रामपंचायत मध्ये व आवारात ग्रामपंचायतचे स्वतःचे शौचालय मुतारी देखील नाही.
ग्रामपंचायत मधील शौचालय व सार्वजनिक शौचालय फक्त कागदावरच.
प्रस्थापित गाव पुढार्यांनीआज उमापूर या गावाला दारिद्रित लोटले असून या गावाचा विकासझालाच नाही.असे ग्रामस्थांकडून आता सांगण्यात येत आहे.
आज उमापूर ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून, आता 30-40 वर्षापासून गावाला
गावाचा खूप विकास करणारे आता नाचू लागले आहे.
पुन्हा पुन्हा निवडून येऊ अशी स्वप्ने पाहत आहेत.
पण या गावाचा विकास यांच्या लक्षातच नाही.असे आता गावकऱ्याकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या पाच वर्षात गावातील तांडा वस्तीची रस्तेच नाही.
व गाव हागणदारी मुक्त नाही.
गावातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पिण्याचे पाणी हेही नाही रस्ते तर नाहीच म्हणून आज उमापूर गावकऱ्यांच्या विचार बदललेला आहे असे जनतेतून सांगण्यात येत आहे…