दै.चालू वार्ता
उमापूर,प्रतिनिधी कृष्णा जाधव
गेवराई- उमापूर मधील रणधुमाळी
राजकारण कोणासाठी?
डॉ.बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक, राजकीय व इतर प्रश्नांबाबत आपण उपेक्षित का ?
ज्या क्रांतीकारी चळवळीला तत्वज्ञान आहे, क्रांतीकारी सामाजिक बांधिलकी आहे.
त्याचं चळवळीसमोर पर्याय नसल्यांने आज अनेक प्रश्नचिन्ह आहेत.
अन्याय, अत्याचार अन् भावनिक प्रश्नांपुरती चळवळ लढते आहे.
राजकीय प्रवाहात स्वतःचे वेगळे निर्णायक, शक्तीशाली स्थान कधी निर्माण केले नाही तर,
मतलबी आंबेडकरव्देषी लबाड लांडगे आपल्याला राजकिय प्रवाहात गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाहित.
सर्व राजकीय पक्षांनी आजपर्यंत नुसता आपला फायदाचं करुन घेतला आहे. राजकीय क्षेत्राबद्दल समाजात नैराश्य आहे.
त्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे आपल्या राजकिय गटा तटांचा फायदा
इतर राजकिय पक्षांनाचं होणार असेल तर राजकारण का,कशासाठी अन् कोणासाठी हा प्रश्न उपस्थित राहतो.
बाबासाहेब ज्या ध्येय धोरणांशी उभे ठाकले होते अन् ज्यासाठी त्यांनी अक्षरशः आपले जीवन कुर्बान केले होते,
त्यांच्या ध्येय धोरणांशी, कार्याशी आपण प्रामाणिक राहिलो असतो तर,
देशाच्या राजकारणात रिपब्लिकन पक्षाचे निश्चितचं वेगळे अढळ स्थान निर्माण झाले असते
अन् आज आपण ६३ वा वर्धापनदिन जल्लोषात साजरा केला असता.
काँग्रेसच्या प्रतिगामी शक्तीला पर्यायी विरोधी पक्ष म्हणून उभा राहिल.’ मात्र, रिपब्लिकन पक्षाची स्थापना ३ ऑक्टोबर १९५७ ची प्रेसिडीयमच्या सर्व सदस्यांनी ठरविल्याप्रमाणे हा पक्ष, ३ ऑक्टोबर १९५८ पर्यंतचं टिकला. वर्षभरात या पक्षाच्या धुरीणांनी विशेषतः एन. शिवराज, दादासाहेब गायकवाड आदी मंडळींनी या काळात पक्षाचा जाहिरनामा, घटना, राज्य, केंद्रिय कार्यकारीण्यांच्या परिपुर्तता न केल्याचे कारण सांगून ऍड. बी. सी. कांबळे, आवळे बाबू, दादासाहेब रुपवते यांनी नवा रिपब्लिकन पक्ष स्थापन करुन, दादासाहेब गायकवाड, एन. शिवराज, बॅ. खोब्रागडे यांच्यावर मात केली. हा नव्याने स्थापन झालेला रिपब्लिकन पक्ष म्हणजे दुरुस्त रिपब्लिकन पक्ष तर जुना, नादुरुस्त रिपब्लिकन पक्ष. म्हणजे, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेपुर्वीचं वादविवाद अन् गट होते दुर्लक्षित करता येणार नाहित, अन् त्यानंतरची वाटचाल कोणत्या दिशेनी चालली हे समोरचं आहे.
बाबासाहेबांच्या पश्चात त्यांची पोलादी, प्रभावशाली, बलाढ्य एकसंघ असलेली संघटना, त्यांना अभिप्रेत असलेली रिपब्लिकन पक्षाची राजकिय चळवळ सामाजिक, राजकीयदृष्टया सक्षम नेतृत्वाअभावी, मतभेद, अहंकार, स्वार्थी राजकिय आकांक्षेपोटी एकसंघ न राहता, गटा तटात विभागला जाऊन दिशाहीन, भरकटत गेली. बाबासाहेबांच्या पश्चात त्यांना अभिप्रेत असलेल्या बलाढ्य संघटनेचा राजकिय पाया अधिक व्यापक, बळकट करण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. मात्र, गटा तटाच्या नेत्यांनी स्वतःचे अस्तित्व जीवंत ठेवण्यासाठी इतर राजकीय पक्षांशी तडजोड केली
काँग्रेसच्या प्रतिगामी शक्तीला पर्यायी विरोधी पक्ष म्हणून उभा राहिल.’ मात्र, रिपब्लिकन पक्षाची स्थापना ३ ऑक्टोबर १९५७ ची प्रेसिडीयमच्या सर्व सदस्यांनी ठरविल्याप्रमाणे हा पक्ष, ३ ऑक्टोबर १९५८ पर्यंतचं टिकला. वर्षभरात या पक्षाच्या धुरीणांनी विशेषतः एन. शिवराज, दादासाहेब गायकवाड आदी मंडळींनी या काळात पक्षाचा जाहिरनामा, घटना, राज्य, केंद्रिय कार्यकारीण्यांच्या परिपुर्तता न केल्याचे कारण सांगून ऍड. बी. सी. कांबळे, आवळे बाबू, दादासाहेब रुपवते यांनी नवा रिपब्लिकन पक्ष स्थापन करुन, दादासाहेब गायकवाड, एन. शिवराज, बॅ. खोब्रागडे यांच्यावर मात केली. हा नव्याने स्थापन झालेला रिपब्लिकन पक्ष म्हणजे दुरुस्त रिपब्लिकन पक्ष तर जुना, नादुरुस्त रिपब्लिकन पक्ष. म्हणजे, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेपुर्वीचं वादविवाद अन् गट होते दुर्लक्षित करता येणार नाहित, अन् त्यानंतरची वाटचाल कोणत्या दिशेनी चालली हे समोरचं आहे.
बाबासाहेबांच्या पश्चात त्यांची पोलादी, प्रभावशाली, बलाढ्य एकसंघ असलेली संघटना, त्यांना अभिप्रेत असलेली रिपब्लिकन पक्षाची राजकिय चळवळ सामाजिक, राजकीयदृष्टया सक्षम नेतृत्वाअभावी, मतभेद, अहंकार, स्वार्थी राजकिय आकांक्षेपोटी एकसंघ न राहता, गटा तटात विभागला जाऊन दिशाहीन, भरकटत गेली. बाबासाहेबांच्या पश्चात त्यांना अभिप्रेत असलेल्या बलाढ्य संघटनेचा राजकिय पाया अधिक व्यापक, बळकट करण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. मात्र, गटा तटाच्या नेत्यांनी स्वतःचे अस्तित्व जीवंत ठेवण्यासाठी इतर राजकीय पक्षांशी तडजोड केली.