दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही असे नैतिक मारोतीराव घोरबांड पाटील या चौदा वर्षाच्या बालकाने माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे चार दिवसापासून अन्नाचा कण व पाण्याचा थेंब न घेता मराठा समाजासाठी आमरण उपोषण करीत आहेत आणि मी माझा वाढदिवस कसा साजरा करू आपण एका दिवसाचा उपास करतो त्यात दोन वेळेस फराळ करतो तरी रात्री भूक सहन होत नाही केव्हा एकदाचा उपवास सोडावे असे वाटते आणि इथे तर मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील चार दिवसापासून अन्नपाण्याविना उपाशी आहेत निश्चितच थकले असतील या अगोदर १७ दिवस आमरण उपोषण केलेले आहे त्यातच महाराष्ट्रात गाठीभेटी,सभा,दौरे दिवस रात्र समाज बांधवांना बोलणे त्यांचे म्हणणे ऐकून घेणे या सर्व घडामोडी सोप्या नाहीत मी शब्दात सांगू शकत नाही मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची मला चिंता लागून राहिली आहे त्यामुळे मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही असे केवळ १४ वर्षाच्या बालकांनी म्हटले आहे तसेच तो पुढे म्हणाला मराठा आरक्षण किती महत्त्वाचे आहे हे आम्हा बालकांना समजत आहे परंतु सरकारला का समजत नाही तुमच्या माध्यमातून तुम्ही सरकारला विचारा असे माध्यम प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी म्हटले आहे तसेच त्यांचे वडिल मारोतीराव पाटील घोरबांड हे म्हणाले मी मराठा असल्याचा मला अभिमान आहे कारण मराठा समाजासाठी लहान मुले आपल्या वाढदिवसाचा त्याग करून पुढील येणाऱ्या भावी पिढीसाठी आरक्षणाची मागणी करीत असून त्यांना आरक्षणाचे महत्त्व पटले असून माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे असे त्यांनी सांगितले आहे.