दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी किशोर फड
“सरकारने अंत पाहु नये लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावे:- सिने अभिनेते रवींद्र ढगे”
जालना जिल्हयातील अंतरवली सराटी येथे
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु केलेल्या लढ्याची ठिणगी आता संपुर्ण महाराष्ट्रामध्ये वनव्यासारखी पसरु लागलेली आहे. संपुर्ण महाराष्ट्रासह बीड जिल्हयातील अनेक गावांमध्ये राजकीय पुढार्यांना मराठ्यांचे संघर्षयोध्दा श्री मनोज जरांगे पाटिल यांनी सांगितल्याप्रमाणे गाव बंदी करण्यात आलेली आहे. अगदी त्याच प्रमाने अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द या गावात राजकीय नेत्याला गाव बंदी असे बॅनर लावले आहे. या बॅनर वर आशाप्रकारे मजकुर लिहीण्यात आलेला आहे की चुलीत गेले नेते आणि चुलीत गेला पक्ष मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्ष व पुढार्यानां गावात प्रवेश मिळणार नाही.
आपली मान मर्यादा राखुन गावात प्रवेश करवा यदा कदाचित गावात प्रवेश केलाच तर घडलेल्या अनुचित प्रकाराला सर्वस्व जो तो नेता जबाबदार राहील आसा ही मजकुर बॅनरवर लिहीण्यात आलेला आहे. त्यामुळे आता राजकीय नेत्यांना गाव बंदी नेत्यासाठी मोठी डोके दुखी ठरणार आहे.
मराठा समाजाला मनोज जरांगे पाटिल यांच्या माध्यमातुन निस्वार्थ नेतृत्व भेटलेलं आहे त्यामुळे सर्व मराठा समाजाची आशा आता पल्लवीत झाल्या आहेत. मनोज जरांगे पाटिल यांच्या नेतृतवातुनच आपल्याला कुठेतरी आरक्षण मिळेल कारण की हे नेतृत्व अस आहे कुठेही मॅनेज होणार नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटिल यांच्या नेतृतवाखाली धानोरा खुर्द येथील मराठा समाज बांधवा सह गावातील ईतर समाजाने राजकीय नेत्यानां एक प्रकारे गाव बंदी करून कोंडीत पकडले आहे.