दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : केंद्र सरकारने सामान्य जनतेकरिता प्रधानमंत्री आवस योजना,रमाई योजना राबविली.परंतु अंजनगाव सुर्जी शहरातील योजना लाभ धारकांना त्या योजनांचा लाभ मिळाला नसतांना जनतेच्या मानगुटीवर भरमसाठ मालमत्ता करवाढीची तलवार ठेऊन अंजनगाव सुर्जी नगरपरिषद सामान्य जनतेचा वध करायला निघाली आहे.त्यामुळे अंजनगाव सुर्जी शहर वासियांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
केंद्र व राज्य शासन अंतर्गत पीएम आवास योजना व तसेच रमाई आवास योजना मधून नागरिकांना घरकुल योजना मंजूर करून दिल्या.त्या तुलनेत अंजनगाव सुर्जी शहरातील नागरिकांना योजनेचा आर्थिक लाभ अद्याप पर्यंत मिळालेला नाही.त्यामुळे मालमत्ता करवाढी संदर्भात नागरिकांचा विचार लक्षात न घेता मोठ्या प्रमाणात नगरपरिषद कार्यालय अंतर्गत मालमत्ता कर आकारण्यात आलेला आहे.दिवाळी सणाच्या तोंडावर शहरातील नागरिकांचा नगरपरिषद कार्यालय स्वार्थापोटी तर दिवाळा तर काढायला निघाली नाही ना? अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे..
शहरातून वाहणारी शहानूर नदी साफ-सफाई संदर्भात न.प.आळशीवृत्तीत दिसून येतच आहे.परंतु शहानूर नदी पात्रात दोनदा वैद्यकीय घनकचरा कचरा आढळला त्यात सुद्धा न.प. प्रशासन कारवाही करतांना दिसत नाही.तर दुसरीकडे वर्षानुवर्षे पूर्वीपासून शहरातील काही ठिकाणचे नाली बांधकाम झालेलेच नाहीत.तर नगरवासियांच्या सोई-सुविधा म्हणून रोड बांधकाम दाखवून काही काळ टिकणारा रोड बांधकाम करणे हे जनतेच्या उघड्या डोळ्यात धूळ झोकून स्वतःची टक्केवारीची भूक मिटविण्यासाठी सामान्य नागरिकांच्या मानगुटीवर चौपट मालमत्ता कर आकारणी करण्यात आलेली आहे.शहराच्या मध्यभागी असलेल्या सती माता मंदिरासमोरील न.प. प्रशासनाची करोडो रुपयांची जागा असून त्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.