गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा / धावरी : – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मात्र चाळीस दिवसांत आरक्षण न मिळाल्यानं मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक गावांत साखळी उपोषणाला सुरुवात झाली असून, राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे.
लोहा तालुक्यातील धावरी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयाचा एकमताने ठराव पारीत करून मराठा समाजाला जोपर्यंत ओबीसी मधुन आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे.
सकल मराठा समाज व ग्रामपंचायत कार्यालय धावरीच्यावतीने लोह्याचे तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना गावबंदीचे निवेदन देऊन गावबंदी करण्यात आली आहे.
जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावांच्या ठिकाणी एकाही राजकीय पक्षाच्या नेत्यांना प्रवेश दिला जाणार नाही आशी यावेळी गावातील सकल मराठा बांधव व ग्रामस्थांनी शपथ घेतली आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे यावेळी नारे देण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला तर होणाऱ्या परिणामांना व नुकसानीला स्वता राजकीय नेते जबाबदार राहतील असा रोश यावेळी सकल मराठा बांधवांच्यावतीने व्यक्त करण्यात आला. व गावबंदीचे बॅनर लावुन गाव राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली.