दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी प्रा.हेमंत खंडाळे
भोर विधानसभा मतदारसंघातील वेल्हे या तालुक्याचे नाव बदलून राजगड करण्यात यावे अशा प्रकारची मागणी आमदार संग्राम थोपटे यांनी शासनदरबारी वेळोवेळी केली आणि त्याला शासनाने मंजुरी दिल्याचे संग्राम थोपटे यांनी आपल्या स्वतःच्या अधिकृत अशा फेसबुक पेजवरून जाहीर केले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांना निश्चितपणे अभिमान वाटावा अशी कामगिरी झालेली आहे. महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींची अशी इच्छा होती आणि ही इच्छापूर्ती करण्याचे काम यानिमित्ताने झाले आहे असे म्हणायला हरकत नाही. सातत्याने या गोष्टीची मागणी आणि त्याचा पाठपुरावा भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी केली याबद्दल समाज माध्यमांवर त्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्वांच्या खास करुन शिवभक्तांच्या स्टेटस व फेसबुक वर जल्लोष साजरा केला जात आहे या बद्दल जनतेच्या व शिव भक्तांच्या वतीने त्यांचे अभिनंदनाचे फेसबुक आणि व्हाट्सअँप द्वारे जात आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे हा तुलनेने कमी लोकसंख्या असलेला तालुका परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिले राजधानी अर्थात राजगड हा किल्ला वेल्हा या तालुक्यात आहे. त्याचबरोबर तोरणा स्वराज्याचा तोरण जिथे बांधलं गेलं हा किल्ला सुद्धा वेल्हे तालुक्यात आहे या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर वेल्हा तालुक्याचे नामकरण राजगड झाल्यामुळे जनतेच्या वतीने याबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.
येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवरायांचा वारसा, छत्रपती शिवरायांचा इतिहास कळावा आणि त्यातून प्रेरणा मिळावी या अनुषंगाने याची मागणी सातत्याने केल्याचे थोपटे यांनी सांगितले आणि वेल्हा तालुक्याचे नामकरण राजगड करण्यात यावे यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याचे थोपटे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर सांगितले आहे.