दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/मुखेड:-मौ.तूपदाळ(बु.) ता.मुखेड जि. नांदेड या गावाला पक्का रस्ता, डांबरीकरण चोंडी ते तूपदाळ (बु) व तूपदाळ (बु) ते तूपदाळ (खु) अद्यापही पक्का रस्ता नाही.या गावाचे जामखेड मध्यम प्रकल्पामुळे इ.स. १९९८ साली पुनर्वसन झाले आहे. याला २६ वर्षे झाले आहेत.तरी आजपर्यंत मौजे.तूपदाळ(बु) येथे शासनाच्या कोणत्याही भौतिक सोयी सुविधा उपलब्ध नाहीत.गावातील जनता सोयी सुविधेच्या अभावामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळली आहे. तरी येणाऱ्या लोकसभेच्या २०२४ निवडणुकीवर गावातील सर्व नागरिकांचा बहिष्कार असणार आहे.गावातील एखादी गरोदर महिला, दिव्यांग किंवा आजारी असलेले नागरिकांना दवाखान्यात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे खूप त्रास होत आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेतील ४ था वर्ग संपल्यानंतर पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक गैरसोय होत आहे त्यामुळे मुलांचे भविष्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.चोंडी ते तूपदाळ (बु) या रस्त्याचे कच्चे काम असून पक्के डांबरीकरण व्हावे. गावामध्ये नाली बांधकाम नाही, पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही, गावामध्ये सिमेंट रस्ता नाही.वर्षानुवर्षे प्रशासनाला अर्ज सादर करूनही मौ.तूपदाळ (बु) चे कुठल्याही राजकीय नेत्यांनी व प्रशासनाने दखल घेतली नाही.तरी मौ. तूपदाळ (बु) येथील नागरिकांचा येत्या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार असणार आहे याची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी.कारण सोळा वर्षांपासून ज्ञानेश्वर नृसिंहराव बेळे ग्रामपंचायत सदस्य यांनी सर्व कामांसाठी पाठपुरावा केला असून आतापर्यंत शासनाने काहीही उत्तर दिलेले नाही.म्हणून आम्ही सर्व गावकरी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे.अशी माहिती समस्त गावकरी मंडळी मौ.तूपदाळ(बु.) यांनी दिली आहे.