महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने, ज्ञानाने संपूर्ण जग प्रभावित आहे. म्हणूनच ‘सिम्बाॅल ऑफ नाॅलेज’ म्हणून बाबासाहेबांची ओळख असून जगभरातील विद्यार्थी त्यांच्यावर अभ्यास करण्यासाठी उत्सुक असतात. त्यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त ज्ञानाचे प्रतीक बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाच्या अथांग महासागरास आणि त्यांच्या कार्यास थोडासा उजाळा देताना.
भारतीय ज्ञानशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ,राजकारणे तत्वज्ञ आणि समाज सुधारक म्हणजेच बोधिसत्व डॉ. भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी दलित चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य( दलित) लोकांविरुद्ध होणारा भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारल्या तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्काचे समर्थन केले ते ब्रिटिश भारताचे पहिले मजूर मंत्री स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री भारतीय घटनेचे शिल्पकार भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना “आधुनिक भारताचे शिल्पकार”,”आधुनिक भारताचे निर्माते”असेही म्हणतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील श्री रामजी वल्द मालोजी सकपाळ हे महू येथेच मेजर सुभेदार पदावरील लष्करी अधिकारी होते. त्यांनी आणि त्यांची पत्नी भीमाबाई यांनी त्यांच्या सेवेची शेवटची वर्षे काली पलटण येथील जन्मस्थान स्मारकाच्या जागेवर असलेल्या बॅरेकमध्ये घालवली. इ स वी १८९१ मध्ये १४ एप्रिल रोजी रामजी सुभेदार कर्तव्यावर असताना रात्री १२ वाजता भीमरावांचा जन्म झाला. मुलाचा प्रारंभिक काळ कबीर पंथी वडील आणि धार्मिक आईच्या कुशीत शिस्तबद्ध होता.
बालक भीमराव यांचे प्राथमिक शिक्षण दापोली व सातारा येथे झाले. १९०७ मध्ये त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन स्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. यावेळी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला व भेट म्हणून त्यांचे शिक्षक श्री कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी त्यांना ‘बुद्ध चरित्र’ हा स्वलिखित ग्रंथ भेट म्हणून दिला. भीमरावांनी बडोदाचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून फेलोशिप मिळाल्यानंतर १९१२ मध्ये मुंबई विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केली. संस्कृत शिकण्यास मनाई असल्याने ते फारसी घेऊन उत्तीर्ण झाले.बी.ए नंतर एम.ए अध्ययन हेतू बडोदा नरेश सयाजी गायकवाड यांची पुन्हा फेलोशिप मिळाल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी प्रवेश घेतला. १९१५ मध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यासाठी त्यांनी ‘कॉमर्स ऑफ एन्शेंट इंडिया’ हा प्रबंध लिहिला. त्यानंतर १९१६ मध्ये अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. उपाधी प्राप्त केली. ‘ब्रिटिश भारतातील प्रांतीय वित्ताचे विकेंद्रीकरण’ हा संशोधनाचा विषय होता.
फेलोशिप पूर्ण केल्यानंतर त्यांना भारतात परतावे लागले, त्यामुळे ते ब्रिटनमार्गे परतत होते. तिथल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये त्यांनी एम.एससी. आणि डी.एससी आणि लॉ इन्स्टिट्यूटमध्ये बार-एट-लॉ पदवीसाठी नोंदणी केली आणि भारतात परतले. सर्वप्रथम शिष्यवृत्तीच्या अटीनुसार त्यांनी बडोद्याच्या राजाच्या दरबारात लष्करी अधिकारी आणि आर्थिक सल्लागार ही जबाबदारी स्वीकारली. संपूर्ण शहरात कोणीही त्याला कामावर घेण्यास तयार नसल्याच्या गंभीर समस्येमुळे तो काही काळानंतर मुंबईत परत आले.
परळ येथे डबक चाळ आणि कामगार वसाहतीत अर्धवेळ अध्यापन आणि वकिली करून अपूर्ण अभ्यास पूर्ण करण्यासाठी तेथे राहत होते आणि पत्नी रमाबाई यांच्यासोबत राहत होते. १९१९ मध्ये डॉ. आंबेडकरांनी राजकीय सुधारणांसाठी स्थापन केलेल्या साऊथबरो कमिशनसमोर राजकारणात दलित प्रतिनिधित्वाच्या बाजूने पुरावे दिले. अशिक्षित आणि गरीब लोकांना जागरूक करण्यासाठी त्यांनी मूकनायक आणि बहिष्कृत इंडिया या साप्ताहिकांचे संपादन करून मूक आणि अशिक्षित आणि गरीब लोकांना जागरुक केले आणि आपले अपूर्ण अभ्यास पूर्ण करण्यासाठी ते लंडन आणि जर्मनी येथे गेले आणि तेथून एम.एससी., डी.एससी., आणि बॅरिस्टर पदव्या प्राप्त केल्या. त्यांच्या M.Sc. चे संशोधनाचे विषय होते इम्पीरियल फायनान्सच्या प्राप्य विकेंद्रीकरणाचा विश्लेषणात्मक अभ्यास आणि त्यांच्या D.Sc. पदवीचा विषय रुपयाची समस्या, त्याची उत्पत्ती आणि उपाय आणि भारतीय परिसंचरण आणि बँकिंगचा इतिहास होता.
डी. लिट. पदवी डॉ. आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने L.L.D आणि उस्मानिया विद्यापीठाने D. Litt या मानद पदवी बहाल केल्या. अशा प्रकारे डॉ. आंबेडकर जागतिक तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले कारण त्यांनी बीए, एमए, एमएससी, पीएचडी, बॅरिस्टर, डीएससी, डी.लिट. एकूण २६ पदव्या मिळवल्या.
भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकरांनी आपल्या ६५ वर्षांच्या आयुष्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, औद्योगिक, घटनात्मक अशा विविध क्षेत्रात अगणित कार्य करून राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
डॉ. बी. आर. आंबेडकरांनी ०२ वर्षे,११ महिने आणि १८ दिवसांच्या अथक परिश्रमाने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवतेवर आधारित भारतीय संविधान तयार केले आणि २६ नोव्हेंबर १९४९ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केले. देशातील सर्व नागरिकांना राष्ट्रीय एकात्मता, व्यक्तीच्या अखंडतेच्या आणि प्रतिष्ठेच्या जीवनपद्धतीने भारावून गेलेली भारतीय संस्कृतीने अभिभूत केले.
१९५१ मध्ये त्यांनी हिंदू कोड ऑफ वुमन एम्पॉवरमेंट विधेयक मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले आणि ते मंजूर झाले नाही तेव्हा त्यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला. सन १९५५ मध्ये त्यांचा Thoughts on Linguistic States हा ग्रंथ प्रकाशित करून, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांची पुनर्रचना करून छोट्या आणि आटोपशीर राज्यांमध्ये पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, जो ४५ वर्षांनंतर काही प्रदेशांमध्ये प्रत्यक्षात आला.लोकशाही बळकट करण्यासाठी राज्याची तीन अंगे, न्यायपालिका, कार्यपालिका आणि विधिमंडळ या स्वतंत्र आणि स्वतंत्र केल्या गेल्या आणि समान नागरी हक्कांनुसार एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य हा घटक सुरू करण्यात आला.
“देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी निजामाच्या जोखडाखाली अडकलेल्या हैदराबाद संस्थानातील लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे नतिक पाठबळ मिळाले होते. त्यातूनच मराठवाड्यात स्वातंत्र्याची पहाट झाली. धर्मसत्ता व राजसत्ता कधीच एकत्र नांदू शकत नाहीत, या शब्दांत बाबासाहेबांनी निजामाच्या धार्मिक सत्तेला विरोध केला होता.”
त्यांनी स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केलेला आहे. अस्पृश्यता, जातीवाद समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मूकनायक, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत, जनता, समता या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समतेचा लढा लढला. बहिष्कृत हितकारिणी, स्वतंत्र मजूर पक्ष अशा संघटना उभारून त्यांनी समतेचा लढ्याला अधिष्ठान प्राप्त करून दिले. आंबेडकरांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, उद्योग आदी क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेले आहे.
डॉ.बी.आर. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली होती. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले. या जयंती समारंभास अनेक देशांचे प्रतिनिधी, भिक्खू संघ व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता.
इ.स. १९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. इ.स. १९५६ ला आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. आंबेडकरांनी दिल्लीशिवाय महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस इ.स. १९५३ पासून सुरुवात केली. इ.स. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात आंबेडकरांनी केली, म्हणून त्यांना भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते समजले जाते.
सन १९९० मध्ये डॉ. बी आर आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. इ.स.१९५५ मध्ये काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या जागतिक बुद्ध परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खूंनी त्यांना “बोधिसत्व” उपाधी प्रदान केली.महाराष्ट्र शासनाने इ.स. २०१७ मध्ये आंबेडकर जयंती ‘ज्ञान दिन’ म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्रात आंबेडकरांची जयंती “ज्ञान दिन” म्हणून साजरी केली जाते. आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी ‘मनुस्मृती’ या ग्रंथाचे जाहिरपणे दहन केले होते. त्यामुळे ‘२५ डिसेंबर’ हा दिवस ‘मनुस्मृती दहन दिन’ म्हणून पाळला जातो.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकांड पंडित होते. त्यांचा विविध विषयांवरचा व्यासंग अफाट होता. व इतर लेखन हे विपूल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखन साहित्यात त्यांनी लिहिलेली ग्रंथ-पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे अधिक लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परिक्षणे हा एवढा संग्रह आंबेडकरांच्या इंग्रजी लेखनाचा आहे. आंबेडकर हे बहुमुखी प्रतिभाशाली होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड व पारसी या भाषा जाणणारे विद्वान होते. आंबेडकरांचे बहुतांश लेखन हे इंग्रजीत, काही मराठीत आणि बाकी इतर भाषेतील आहे. त्यांनी आपल्या लेखनातून धर्मसुधारणा व समाजसुधारणा याकडे प्रामुख्याने लक्ष दिले. महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांच्या भाषण व लेखन साहित्याचे आतापर्यंत एकूण २२ खंड प्रकाशित केले आहे, अजून खूप बरेचशे लेखन प्रकाशीत आहे. त्यांच्या संपूर्ण साहित्याला एकूण ४२ खंड देखील अपूरे पडतील असे आंबेडकरांच्या ग्रंथावर काम करणाऱ्या प्रकाशन समितीचे म्हणने आहे. मल्याळम भाषेत बाबासाहेबांच्या साहित्याचे ४० खंडावर प्रकाशीत झाली आहे. त्यांनी अनेक विषयांवर मूलभूत चिंतन केले. त्यातून अनेक अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथसंपदेची निर्मिती झाली. या ग्रंथसंपदेतूनच त्यांची सर्वसमावेशक आणि समन्यायी अशी वैचारीक भूमिका स्वयंस्पष्ट होते. त्यांचे अनुयायी बाबासाहेबांच्या सन्मार्थ जय भीम चा नारा देतात. आज आपण बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार आपल्या जीवनात अमलात आणण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे. जय भीम.
शब्दांकन- पत्रकार संतोष हरी कांबळे
९७६३३९५५५७