राजापूर मधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा टाहो…
समिर शिरवडकर -प्रतिनिधी
राजापूर:-तालुक्यातील मौजे सौंदळ मांजरे वाडीतील शेतकरी श्री कानू तुकाराम मटकर यांची काजू बाग आणि बैल गोठा (वाडा) वणव्यात जळून खाक झाला असून मोठे नुकसान झाले आहे स्वकष्टाने व मेहनतीने लागवड केलेली बाग अज्ञात व्यक्तींनी घातलेल्या वणव्यामुळे शेतकरी मटकर यांची उत्पन्न देणारी झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असल्याने श्री मटकर यांना मानसिक धक्का बसला असून, सदर आगीत भस्मसात झालेल्या काजू बाग आणि इतर फळझाडांची झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी श्री मटकर यांनी कॄषी अधिकारी पाचल विभाग, ग्रामसेवक, तलाठी,सरपंच पोलिस पाटील सौंदळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
सौंदळ मांजरे वाडीतील शेतकरी श्री कानू तुकाराम मटकर यांची करनवले येथे काजू झाडे – ५५०, साग – ४४०, आंबा २, फणस – ३, लिंबू – ३ आणि बैल गोठा (वाडा) वणव्यात जळून अंदाजे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे संबंधित विभागाने वणव्यात जळलेल्या माझ्या बागेची प्रत्यक्ष पाहणी करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी श्री मटकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या,प्रकरणी दैनिक चालू वार्ता ने महिती घेतली असता,संमधीत स.जा चे तलाठी श्री. नामदेव पाटील यांच्याशी संपर्क केला असता,आम्ही तो पंचनामा अहवाल तहसीलदार राजापूर याकडे पुढील कार्यवाही साठी दिला असलेच समजते.परंतु, नुकसानभरपाई चा अहवाल आणि कारवाई ही किती दिवसात होऊन शेतकऱ्यांना मिळेल यावर मात्र प्रश्नः चिन्ह आहे.कारण सर्वच अधिकारी वर्ग हा निवडणुकीच्या कामात आहे.
तसेच, राजापूर मधील केळवली विभागातील गरीब कुटुंबातील आजी-आजोबा वर सुद्धा हीच परिस्थिती ओढवली आहे.कोंडवशी -चव्हाणावादी मधील श्री.तुकाराम विष्णु चव्हाण यांचे घर नैसर्गिक आपत्तीमुळे भुईसपाट झाले असून,आज चव्हाण कुटूंबीय बेघर झाले आहेत.४ मार्च २४ ला या चव्हाण कुटूंबियांवर मोठं संकट ओढवले, आणि होत्याच नव्हतं झालं. संपूर्ण घर जमीनदोस्त झालं असून,शेजारी पाजरिणी मदतीचा हात पुढे करून आजी आजोबांना मदत केली. परंतु गोर गरिबांचा सरकार गेले एक महिना झाला तरी,पंचनामा अहवाल सादर होऊनही गोर गरीबाच्या मदतीला धावून आले नाही..मग हे सरकार कुणाचे? असा प्रश्न या मठकर आणि चव्हाण कुटूंबियांना पडला आहे. त्यात तुकाराम चव्हाण यांना घरकुल सुध्दा २०२२ मंजूर आहे,परंतु, त्याचा ही अजून ठावठिकाणा नाही.
कोकणातील खास करून रत्नागिरी जिल्ह्यातील आग लागून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान दरवर्षी होत असून सरकारकडून शेतकऱ्यांना वनवा जाऊन आगी लागत असल्या कारणाने कोणत्याही प्रकारचे नुकसान भरपाई दिलीजात नाही कागदोपत्री खाली पंचनामे केले जातात याकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी महाराष्ट्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून आपत्कालीन परिस्थितीत समाविष्ट करण्याची मागणी करावी हा विषय लावून धरावा अशी माझी सर्वच लोकप्रतिनिधी यांना कळकळीची विनंती करतो की आपल्या माध्यमातून आव्हान करतो अशा प्रश्नांकडे आपण गांभीर्याने घ्याल असं सर्वच लोकप्रतिनिधी सरकार दरबारी असणारे निकष बदली करण्यात यावे.
विलास गोपाळ राऊत- ग्रामस्थ सौंदळ…
निदान या प्रकरणी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून निवडणूक कार्यकाळ मध्ये मदत मिळवून द्यावी…
मंगेश चव्हाण-ग्रा. प. सदस्य-केळवली…