दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनीधी माधव गोटमवाड
दिनांक 10 मे रोजी कंधार येथे श्री सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्र चा सकाळी 10 वाजता भव्य शुभारंभ आयोजित केला आहे.
शेती आणि शेतकरी हे व्याकरणदृष्ट्या जरी वेगळे शब्द असले तरी प्रत्यक्षात ते एकमेकांना पूरक आहेत.
शेतकरी, शेती आणि कृषी सेवा केंद्र यांचा एक घनिष्ठ संबंध आहे. शेतीसाठी बियाणे,रासायनिक खते तसेच विविध प्रकारचे कीटक नाशके हे सगळे मिळण्याचे ठिकाण म्हणजेच कृषी सेवा केंद्र होय.
भारतात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, त्यामुळे शेतीशी निगडीत सर्व अवजारे, औषधे, कीटकनाशके व खते शेतकर्यांना एकाच छताखाली माफक दरात मिळावीत या उद्देशाने गोलेगाव चे रहिवाशी श्री बालाजी जकवाड यांनी श्री.सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्र सुरू केले आहे.
पावसाची अनियमितता, कीड रोगांच्या प्रादुर्भावानुसार वाढलेली महागाई लक्षात घेता खरिप हंगामामध्ये कृषी विकास यंत्रणेने योग्य वाणाची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे लागणार आहे . यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनावरील खर्च कमी होवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल.कृषीसेवा केंद्रधारक हा कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील महत्वाचा दूवा आहे. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा देण्याचे काम कृषी सेवा केंद्र धारकांचे आहे. हे काम आम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे करणार असे बालाजी जकवाड म्हणाले ..