दैनिक चालू वार्ता
पालघर प्रतिनिधी.
मिलिंद खरात.
कल्याण
भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद डोहोळे पाडा शाळेतील शिक्षक अशोक गायकवाड यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल आमदार संजय केळकर यांचे हस्ते ट्रॉफी,प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी दैनिक ठाणे वैभव चे कार्यकारी संपादक मिलिंद बळ्ळाल,प्रा.डाॅ,वैदेही दप्तरदार संचलिका जनता कल्याण सहकारी बँक,विजयकुमार देसले साहित्यिक, मच्छिंद्र कांबळे समर्थ ॲडव्हटाईज कल्याण, निखिल बल्लाळ कार्यकारी संपादक ठाणे वैभव उपस्थित होते.
सहशिक्षक अशोक गायकवाड हे मुळचे बापगाव ता.भिवंडी जि.ठाणे येथील मूळ रहिवाशी असून जिल्हा परिषद शाळा डोहोळे पाडा येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.ते 12 मार्च 1997 रोजी सेवेत रुजू झाले असून 24 वर्ष 6 महिने सेवा पूर्ण झाली आहे.त्यांची प्रथम नेमणूक जिल्हा परिषद शाळा जानवल ता.भिवंडी येथे झाली तेव्हा तेथे भाड्याच्या कच्चा स्वरूपाच्या घरात शाळा भरत असे तेथे पक्की स्वरूपाची दोन मजली सुंदर इमारत बांधून घेण्यात त्यांना यश आले.शिष्यवृत्तीचा 100% निकाल,शैक्षणिक उठावातून शाळा शुशोभिकरण, विज्ञान प्रदर्शनात सहभाग, सहशालेय उपक्रम राबविणे,अशा प्रकारे तेथे 14 वर्षं सेवा केली.तेथे सुद्धा अनुसूचित जमातीचे विद्यार्थी व पालकांमध्ये शिक्षणाविषयी अनास्था अशा कठीण परिस्थिती ज्ञानदानाचे काम करून विद्यार्थी घडविले. तद्नंतर जिल्हापरिषद शाळा करंजोटी येथे 8 वर्ष सेवा केली .तेथे सुद्धा अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना घडविण्याची संधी मिळाली.होप संस्थेच्या माध्यमातून शाळेला भौतिक सुविधा मिळवणे,वर्ग ई लर्निग करणे,शाळा सुशोभित करणे,शालेय परिसरात बाग तयार करणे,शाळेला इन्व्हर्टर प्राप्त करून घेणे,शिष्यवृत्ती निकाल 100% लावणे,शाळेत महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथी निमित्त विविध उपक्रम राबविणे, वृक्षारोपण करणे,विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभागी करणे,केंद्र व तालुकास्तरावर बक्षिस मिळविणे इ. अनेक उल्लेखनीय कार्य करण्यात आले.सन 2019 पासून शाळा डोहोळेपाडा केंद्र कोशिंबी येथे कोरोना काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी सतत विद्यार्थांच्या घरी गृहभेटी देणे,कोरोना विषयी जनजागृती करणे,दैनंदिन अध्ययन अध्यापन मार्गदर्शन करणे,पालकांचे प्रबोधन करणे,शाळेत 100% अनुसूचित जमाती( आदिवासी) विद्यार्थी असल्या कारणाने पालकांकडे स्मार्ट मोबाईल फोन नसल्या कारणाने online शिक्षण घेणे शक्य नसे अशा वेळी शाळेतच गटा गटाने offline शिक्षणच मुलांना देणे,विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटी रेल्वे मुंबई यांस कडून 500 लिटरची पाण्याची टाकी उपलब्ध करून घेणे,वर्गात महापुरुषांचे फोटो शैक्षणिक उठावातून लावणे,स्वताच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय लेखन साहित्य वाटप करणे,समाजातील गरजू विधवा महिलांना आर्थिक मदत मिळवून देणे,संविधान गौरव दिन साजरा करून भारतीय संविधानाची प्रत वाटप करणे,संविधान गौरव रॅली काढणे,शिक्षण परिषद निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करणे,पाणी आडवा पाणी जिरवा या उपक्रमानुसार केंद्रस्तारावर बंधारा बांधणे, जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील महिलांचा सन्मान करणे,उच्चशिक्षित मुलींचा सत्कार करणे,कोरोना काळात गरजू कुटूंबाला जिवणावश्यक वस्तूचे वाटप करणे,शालेय विद्यार्थ्यांना सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद वतीने बूट वाटप करणे,शालेय लेखन साहित्य वाटप करणे,वृशारोपण करणे,कोविड काळात 100कुटूंबाना जिवणावश्यक वस्तूंचे वाटप करणे,कास्ट्राईब शिक्षक संघटना-महाराष्ट्र राज्य वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविणे जसे आदिवासी महिलांना साडी वाटप,विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप, ठाणे जिल्ह्यातील गरजू कुटूंबांना जिवणावश्यक वस्तूचे वाटप, आजारी,आर्थिक दुर्बल यांना आर्थिक मदत करणे,शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवणे, गुणवंत शिक्षकांना आदर्श पुरस्कार देऊन गौरव करणे,शाळेत विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले,माता रमाई,राजश्री शाहू महाराज, महात्मा गांधी, अण्णाभाऊ साठे,अशा सर्व महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम राबविले जातात, अशा प्रकारे अशोक गायकवाड हे कास्ट्राईब शिक्षक संघटना-महाराष्ट्र राज्य कोकण विभाग उपाध्यक्ष तसेच सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद संस्थेचे सरचिटणीस असून अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम ते राबवत असल्याकारणाने त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल दैनिक ठाणे वैभव ने घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले.