तरुणाईच्या गर्दीचा बादशहा, इंजि. शिवाजी राजे पाटील.
जवाहरलाल नेहरु लिडरशिप इन्स्टिट्युटचे मास्टर कोच, टाटा मोटर्स लिमिटेडचे सर्व्हिस इंजिनिअर, रुद्रा अर्थमुव्हर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्हेंन्डर पार्टनर, एस. आर. थोरात डेअरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, असंख्य अग्रगण्य नियतकालिकांचे प्रमुख स्तंभलेखक, अत्यंत तरुण वयात व्यावसायिक करिअरचे बहुपर्यायी अनुभव लाभलेले इंजि. शिवाजीराजे सुनिता भिमराव पाटील उर्फ आण्णा हे जगतमित्र अजातशत्रू व्यक्ती आज वयाच्या पन्नाशीत (१० ऑक्टोबर १९७२) प्रवेश करत आहेत. परमआदरणीय आण्णांना एकोणपन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मनुष्य हा नेहमी सकारात्मक, आनंदी व हसतमुख असला पाहिजे. माणसाच्या वागण्याबोलण्यामुळे समोरील व्यक्ती सुखावला पाहिजे, खुलला पाहिजे, आनंदून गेला पाहिजे. आपलं वागणं बोलणं असंच असावं. स्नेहींनो, एखादा व्यक्ती एवढा चांगला असू शकतो? की ज्यांचा सहवास प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. असे व्यक्तिमत्त्व म्हणजे परम आदरणीय इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर! त्यांच्या सानिध्यात आलेल्या हजारोंचे जीवन सकारात्मक वळणावर येऊन पोहोचले आहे. हा लेख वाचणाऱ्यांना वाटेल की असं काय केलंय या माणसाने…? स्नेहींनो, इंजि. शिवाजीराजे पाटील हे समुपदेशक (फॅमिली अॅन्ड करिअर काऊंन्सिलर) आहेत. त्यांनी घटस्फोटाच्या निर्णयावर आलेल्या शेकडो जणांचे संसार विनामोबदला सुरळीत केले आहेत. परस्पर सामंजस्य, प्रेम, आनंदाच्या मार्गावर आणून ठेवले आहेत. आपल्या सकारात्मक, सन्मानरक्षी कार्यामुळे ते आज असंख्य विद्यार्थी मित्रमैत्रिणींच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यांच्या व्याख्यानाला युवक युवतींची अक्षरशः लाखोंची गर्दी उसळते. त्यामुळे त्यांना ‘तरुणाईच्या गर्दीचा बादशहा’ म्हटले जाते.
सरांना सोबतचा प्रवास माझा आणि माझ्या कुटूंबाचा जास्त काळाचा नाही. तरीही असे वाटते की ते अगदी लहानपणा पासुनचे माझे परममित्र, गुरू आहेत. मला इथे एक छोटासा अनुभव सांगावा वाटतो. मी एक पत्रकार या नात्याने सरांचे लेख, बातम्या आमच्या पोर्टलवर लावत असे. सरांनी एकदा खुप सुंदर सुंदर लेख लिहिला होता. पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या मुली विषयी. पण नकळत माझ्या हातून मोठी चुक झाली. मी त्या लेखाला बातमी बनवुन स्वतः चे नाव दिले. ती बातमी सरांना पाठवली. सरांनी माझे अभिनंदन केले. त्यांनी माझी चुक आहे म्हणून रागावले नाहित आणि ती चुक माझ्या निदर्शनासही आणून दिली नाही. सर स्वतः अनेक विषयावर स्तंभलेख लिहित असतात त्यांनी अनेक पुस्तके ही लिहिली आहेत.
असाच एकदा सरांचा स्तंभलेख वाचत असताना माझी तेंव्हाची चुक माझ्या लक्षात आली. असे अनेक अनुभवातून सरांकडून खूप काही मला आणि माझ्या कुटुंबाला शिकता आले आहे.
आणि अनेक अनुभव आहेत ते इथे शब्दात मांडण्यासाठी माझ्याकडे शब्दसाठा अपुरा पडतो.
‘अष्टपैलू शांत संयमी, कर्तबगार व्यक्तिमत्व म्हणजे इंजि. शिवाजी राजे पाटील.’
मित्रसमृध्दीने कुबेरालाही लाजविणाऱ्या सुसंस्कृत व सुसंस्कारित आण्णांना दिर्घायुरारोग्य लाभो हीच सदिच्छा, शतायुषी व्हा महागुरू..!! जिवेत शरदः शतम्
दै. चालु वार्ता
कंधार ता. प्रतिनिधी
सौ. रेखा गोरडवार.